Sunday , September 8 2024
Breaking News

मुख्य बातमी

मुलायम सिंह यादव यांचे निधन

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण …

Read More »

यंदाही इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या हालचाली सुरू

अंकली (प्रतिनिधी) : इथेनॉलच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन म्हणून केंद्राच्या वतीने यंदाही इथेनॉल दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्याच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपयांची वाढ इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांना मिळण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वर्षी केंद्राने इथेनॉलच्या दरात या प्रमाणात वाढ केली आहे. इथेनॉलचे वर्ष डिसेंबर …

Read More »

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दारुच्या नशेत असल्याने त्यांना विमानातून खाली उतरवले?

  नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस …

Read More »

तारीख पे तारीख; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी २७ सप्टेंबरला!

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीश उदय लळीत यांचा समावेश नाही. सत्ता संघर्षावरची महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा …

Read More »

हिजाब प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकूण 24 याचिका सुनावणीसाठी; उच्च न्यायालय निर्णयाला आव्हान

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, उच्च न्यायालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करणारा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला …

Read More »

गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा

  नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे. 16 ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर …

Read More »

आपच्या आमदारांना भाजपकडून 20 कोटींची ऑफर : खासदार संजय सिंह

  नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीही करून दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमच्या आमदारांवर दबाव आणल्या जात आहे, असा आरोप …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष वाद आता घटनापीठाकडे; 25 ऑगस्टपासून नवा अध्याय सुरू

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आता 5 सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचे? या मुद्द्यावर आज दुपारी 3 वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी …

Read More »

भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना वगळले

केंद्रीय निवडणूक समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि सरबानंद सोनोवाल यांनी संसदीय मंडळात स्थान देण्यात आले …

Read More »

पहलगाममध्ये आयटीबीपीची बस नदीत कोसळली; 6 जवान शहीद

  नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणार्‍या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. …

Read More »