रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय स्तरासाठी निवड आंबोली : आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली येथील 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सिंधुदुर्गच्या दोन कॅडेट्सनी अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य संचालनालयस्तरीय थल सैनिक शिबिर (TSC-2026) अंतर्गत आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह सिंधुदुर्ग …
Read More »राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पहाटे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत आणि महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहावी, अशी प्रार्थना केली. यंदाच्या …
Read More »२६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत विद्यार्थी-पालकांसह मोर्चा; संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत २६ जुलै रोजी मुंबईत विद्यार्थी आणि पालकांसह निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा …
Read More »आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन …
Read More »पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास
पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)चे संस्थापक-अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी (18 जुलै) पुण्यात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी, …
Read More »समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रोपे व हँडवॉशचे वाटप
मुमेवाडी : वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, हा आदर्श संदेश देत मुमेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात आले. यावेळी कुमार अवधूत घाटगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच …
Read More »तेऊरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी मोहन पाटील यांची निवड
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार चंदगड (प्रतिनिधी) : तेऊरवाडी येथील तेऊरवाडी विद्यालय तेऊरवाडीच्या मुख्याध्यापकपदी ज्येष्ठ शिक्षक, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मा. श्री. मोहन पाटील यांची पदोन्नतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या …
Read More »दिशा शिक्षण व विकास केंद्राला नरसू पाटील यांच्या नेतृत्वाची नवी दिशा
अध्यक्षपदी बिनविरोध निवड; शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या विस्ताराचा संकल्प गडहिंग्लज : दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत दिशा शिक्षण व विकास केंद्र, गडहिंग्लजच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष नरसू पाटील यांची सर्व सभासदांनी एकमताने बिनविरोध निवड केली. उच्च न्यायालय व धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक श्री. सत्यनारायण शेनॉय यांच्या निरीक्षणाखाली दि. १७ …
Read More »श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती बाबत पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर (जिमाका) : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने कामे सुरू आहेत. या कामांमध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचे अपयश नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण …
Read More »जेजुरी पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर सोमवारी सकाळी दुर्दैवी अपघाताची शोककळा पसरली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta