Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं

    नवी दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या नीट (NEET) परीक्षेतील अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (X) द्वारे अधिकृतपणे कळवले की, त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. आंदोलनाची तीव्रता आणि राजीनाम्याची …

Read More »

पंढरीची वारी’ विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन

  फोंडा (गोवा) : एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ फोंडा-गोवा यांच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा दहावा उपक्रम असून यंदाचा विषय ‘पंढरीची वारी’ असा निश्चित करण्यात आला आहे. हा उपक्रम २० जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात …

Read More »

पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, १० कोटी दंडाच्या नव्या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

  नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. सुधारित तरतुदींनुसार, सार्वजनिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटविणे किंवा अशा गुन्ह्यात सहभागी …

Read More »

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्री झालेल्या …

Read More »

पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी; संसदेपासून पंतप्रधान निवासापर्यंत विरोधकांचा हल्लाबोल

  नवी दिल्ली : पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील राजकीय दबाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. संसदेत सातत्याने गदारोळ, चर्चेची विरोधकांची मागणी आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने काढलेले आंदोलन यामुळे राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले. संसदेत पेपरफुटी …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; २३ जणांचा मृत्यू

  श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. पूंछ जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तसेच जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर …

Read More »

नीट पेपरफुटी प्रकरण तापले; राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन

  नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका करत, …

Read More »

संसद भवनाकडे मोर्चा; आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

  नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी काक्रोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन रविवारी तीव्र झाले. संसद भवनाकडे “चलो संसद” मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवून लाठीचार्ज केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, …

Read More »

गोव्याच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे निधन

    पणजी : गोव्यातील ताळगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि पणजीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. निधनाच्या वेळी त्या ५६ वर्षांच्या होत्या. जेनिफर मोन्सेरात या गोव्याच्या राजकारणातील प्रभावी महिला …

Read More »

मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकत्व संपत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

  नवी दिल्ली : मतदार यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव नसल्याने किंवा नाव वगळण्यात आल्याने तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. नागरिकत्व निश्चित करण्यासाठी कायद्यानुसार स्वतंत्र प्रक्रिया असून ती निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील विशेष मतदार यादी …

Read More »