खानापूर : खानापूर ते एम. के. हुबळी मार्गावर व्हाया हिरेहट्टीहोळी गावातून सुरू करण्यात आलेल्या नवीन बससेवेचे उद्घाटन खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या बससेवेमुळे हिरेहट्टीहोळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या वेळी बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे गॅरंटी योजनेचे …
Read More »म. ए. युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील हलशी, हलशिवाडी, गुंडपी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे : चंद्रकांत देसाई खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील …
Read More »‘माझं ध्येय आणि मी’ : शिक्षणातूनच घडेल उद्याची समृद्ध ‘ताराराणी’!
खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश संपादन केले पाहिजे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास आजची विद्यार्थिनी भविष्यातील एक सक्षम ‘ताराराणी’ म्हणून घडेल, असे प्रबोधनात्मक व प्रेरणादायी उद्गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. …
Read More »ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना महत्त्वाचे आवाहन करत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही रेशन दुकानदाराला एक रुपयाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. सध्या खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे …
Read More »नाथाजीरावांनी शिक्षणातून बहुजनांच्या उत्थानाचे कार्य केले
पत्रकार वासुदेव चौगुले : खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन खानापूर : नाथाजीराव हलगेकर यांनी जातीपातीला थारा न देता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अपार कष्ट घेतले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठा मंडळ संस्थेचे नेटाने सारथ्य करत ज्ञानदानाचे प्रभावी जाळे उभे केले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी ज्ञानप्रसाराचा प्रभावीपणे वापर केला असे …
Read More »खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड
खानापूर : कर्नाटक राज्य माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना बंगळूर यांच्या माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना खानापूर तालुका अध्यक्षपदी मणतुर्गा हायस्कुल मणतुर्गा हायस्कुलचे शारिरीक शिक्षक श्री. किरण आर. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. किरण पाटील हे चन्नेवाडी गावचे सुपुत्र असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव असे कार्य आहे. अनेक तालुकास्तरीय तसेच …
Read More »कृषी तलावात पडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कक्केरी परिसरात हळहळ
कक्केरी : कक्केरी येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा मंगळवारी सकाळी शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. शेतातील कृषी तलावाजवळ वाढलेले गवत व कचरा साफ करत असताना त्यांचा पाय घसरून ते …
Read More »माळअंकले व झाडअंकले गावांना अखेर बससेवेची जोडणी
सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेला प्रारंभ; ग्रामस्थांमध्ये उत्साह खानापूर : खानापूर तालुक्यातील माळअंकले व झाडअंकले या गावांना दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बससेवेला अखेर सुरुवात झाली. खानापूर तालुका गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. गावात पहिल्यांदाच बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण …
Read More »पंचहमी योजनेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब; वीजपुरवठा, शिधापत्रिका, गृहलक्ष्मी प्रश्नांवर जोरदार चर्चा
खानापूर : पंचहमी योजनेच्या मासिक आढावा बैठकी सोमवारी (ता.२०) रोजी तालुका पंचायत सभागृहात घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यात आला. विशेषतः गृहज्योती योजना, गृहलक्ष्मी योजना, शिधापत्रिका वितरण आणि वीजपुरवठा सेवेबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश …
Read More »हत्तरगुंजी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला; कारवाईसाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : हत्तरगुंजी (ता. खानापूर) येथील गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी खानापूर तहसीलदारांकडे केली आहे. हलकर्णी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार, हत्तरगुंजी गावच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta