Friday , June 5 2026
Breaking News

खानापूर

खानापूर पंचहमी योजना समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा; बससेवा, रेशन वितरण आणि वीज समस्यांवर सदस्य आक्रमक

  खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक बुधवारी (ता. ३) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. योजनेचे कार्यदर्शी रमेश मेत्री उपस्थित होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत आणि मागील अहवाल …

Read More »

खानापूरात मराठी माध्यम विभागाचा शुभारंभ; शाळा प्रारंभोत्सव उत्साहात

  खानापूर : खानापूर शहरात यंदापासून सुरू झालेल्या सरकारी माध्यमिक शाळेच्या मराठी माध्यम विभागाचा उद्घाटन सोहळा आणि शाळा प्रारंभोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते नव्या मराठी माध्यम विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका पंचायतचे कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री, शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, पालक, विद्यार्थी आणि …

Read More »

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोरदार विरोध दर्शविला आहे. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी आणि केकेकोप्प गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी केआयडीबी विशेष भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत प्रकल्पाविरोधात लेखी आक्षेप नोंदविले. विशेष भूअधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोंबर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक …

Read More »

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांच्या वतीने हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करत याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर तसेच बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांना खानापूरचे तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रास्ताविक व स्वागतास चिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले, यावेळी 1 जून 2026 रोजी 1 जून 1986 च्या कन्नडसक्ति आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाभागातील विविध आंदोलनात त्यांना हिंडलगा येथे …

Read More »

खत टंचाई आणि वीज समस्येवरून खानापूर समिती आक्रमक; तहसीलदार व हेस्कॉमला निवेदन

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने तालुक्यातील खत टंचाई आणि विस्कळीत वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत तहसीलदार आणि हेस्कॉम प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. पेरणीच्या तोंडावर खतांचा तुटवडा खानापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, डीएपी आणि युरिया खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने …

Read More »

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांची बैठक संपन्न; समितीच्या ध्येय धोरणाशी बांधील रहात कार्य करण्याचा निर्धार

  बेळगाव : रविवार दिनांक २४ मे २०२५ रोजी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक श्री शिवस्मारक येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये युवकांनी मराठी भाषा, संस्कृती तसेच मराठी शाळा टिकवण्यासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा केली. भविष्यात समितीच्या ध्येय धोरणाशी बांधील रहात मराठीसाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी रावसाहेब …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवारी

  खानापूर : सीमाभागातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवार, दि. २५ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारक येथे ही बैठक पार पडणार असून समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत …

Read More »

भीमगड परिसरातील विकासकामांवर प्रशासनाची नजर; विशेष परवानगीशिवाय कामांना बंदी

  खानापूर : भीमगड अभयारण्य परिसरातील इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आता कोणतेही विकासकाम किंवा व्यावसायिक प्रकल्प राबविण्यासाठी विशेष परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनजमिनींचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. भीमगड अभयारण्याभोवती असलेल्या चिखले, …

Read More »

दहावीतील यश हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल : दत्तात्रय देसाई

    खानापूर : दहावीतील यश हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल असते. या यशानंतर पुढील शिक्षण घेताना देखील सातत्य, मेहनत आणि शिस्त कायम ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे. योग्य नियोजन, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर मोठे यश मिळविता येते असे प्रतिपादन गुंडपी …

Read More »