केंद्र सरकारने “ज्ञान भारतम्” योजनेअंतर्गत दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी विविध संस्थांना, मठांना, विद्यापीठांना तसेच खासगी संग्राहाकांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. खानापूरातील मराठी साहित्याचे जाणते अभ्यासक व म. ए. समितीचे दिवंगत नेते कै. उदयसिंग दत्ताजीराव सरदेसाई यांनी आपल्या आवडीतून गोळा केलेल्या त्यांच्या …
Read More »मणतुर्गा येथे दुकान फोडून चोरी; २० हजाराचा मुद्देमाल लंपास
खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा–हेमाडगा रस्त्यालगत असलेल्या एका पान टपरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे १५ ते २० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम भरमानी देवलतकर यांनी उपजीविकेसाठी रस्त्यालगत छोटासा दुकानाचा खोका उभारला होता. …
Read More »फेरमूल्यांकनानंतर झुंजवाड (के.एन.) येथील दिव्या देसाई 625 पैकी 625 गुणांसह कर्नाटकात संयुक्त अव्वल
खानापूर : तालुक्यातील झुंजवाड (के.एन.) येथील कु. दिव्या प्रदीप देसाई हिने आपल्या चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर राज्यस्तरीय ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. फेरमूल्यांकनानंतर तिने 625 पैकी तब्बल 625 गुण मिळवत कर्नाटकात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. प्राथमिक निकालात दिव्याला 625 पैकी 624 गुण मिळाले होते. सर्व विषयांत शंभर पैकी …
Read More »सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून पेन्शन सुरू करा : प्रसाद पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन
21 हजार दिव्यांग, विधवा व वृद्धांच्या पेन्शनवर गंडांतर खानापूर : खानापूर तालुक्यातील सुमारे 21 हजार दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या पेन्शनवर महसूल विभागाने स्थगिती दिल्याने संबंधित लाभार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी गर्लगुंजी …
Read More »नागुर्डा येथे श्री नागेश महारुद्र मंदिराचा उद्घाटन सोहळा; आमदार श्री. रोहित आर. आर. आबा पाटील उपस्थित राहणार
खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील जिर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ दैवत व ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १४ मे २०२६ ते शनिवार दि. १६ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय धार्मिक …
Read More »हलशी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून रुग्णाला उद्धट वागणूक; रेशन कार्ड नसल्याने नाकारले उपचार
खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे, पण हलसीमध्ये रुग्णाला उपचारांऐवजी रेशन कार्ड विचारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून एका महिला नेत्याने डॉक्टरांची चांगलीच शाळा घेतली. खानापूर तालुक्यातील हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे दोन महिला रुग्ण अडचणीत आल्या. हत्तरवाड गावातील …
Read More »बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चा सचिव सौ. प्रवीणा फटाण यांचा सत्कार
खानापूर : बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चा सचिवपदी सौ. प्रवीणा सुनील फटाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त खानापूर भाजप कार्यालयात सौ. प्रवीणा फटाण यांचा सत्कार आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या …
Read More »दहावी परीक्षेत राज्यात संयुक्त पाचवा क्रमांक मिळवलेल्या अनुष्का देसाई हिचा आमदार विठ्ठल हलगेकरांकडून सत्कार
खानापूर : तालुक्यातील विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. विशेषत मुली शिक्षणात आघाडी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. हलशीवाडी येथील अनुष्का रघुनाथ देसाई हिने दहावीच्या परीक्षेत ६२१ गुण मिळवत खानापूर तालुक्यात दुसरा क्रमांक …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांचा 67 वा वाढदिवस शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाला. श्री. गोपाळ देसाई यांचे बालपण कष्टात गेले. इच्छा असून देखील घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर भारतीय सैन्य दलात दाखल होऊन गोपाळ देसाई यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून …
Read More »“बापू गेले…”; अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केल्या भावना
मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन् नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकलेल्या आपल्या पहिल्या अपत्याला आपल्या बहिणीकडं मला सोडलं. का तर याच मोठ्या बहिणीनं बापूंना ही शिकवून शहाणं …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta