Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्र

माफी मान्य नाही, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा : एस. एम. देशमुख

  मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी असून त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा इशारा एस. एम. देशमुख यांनी दिला आहे.. शिवसेनेच्या ठाकरे …

Read More »

अखेर पश्चिम घाट ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र’ घोषित होण्याच्या मार्गावर; केंद्र सरकार लवकरच अधिसूचना काढणार

मुंबई : तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींवर आता केंद्र सरकारने हालचाल सुरू केली असून, पश्चिम घाटातील मोठा भूभाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील (Ecologically Sensitive Area) म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटातील संपूर्ण …

Read More »

श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभ

  केंद्रीय व राज्यातील विविध मंत्र्यांची राहणार उपस्थिती कोल्हापूर (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व महाराष्ट्र …

Read More »

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटली? ६ खासदार बैठकीला गैरहजर

  मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली येथे बोलावण्यात आलेल्या महत्त्वाच्या संसदीय बैठकीला पक्षाचे ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हिप …

Read More »

माधुरी हत्तीण अखेर कोल्हापूरला परतणार; ‘वनतारा’तील वर्षभराच्या उपचारांना यश

  मुंबई : कोल्हापूरची लाडकी हत्तीण ‘माधुरी’ आता पुन्हा आपल्या घरी परतण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून गुजरातमधील ‘वनतारा’ येथे तिच्यावर विशेष उपचार सुरू होते. या उपचारांना यश मिळाल्यानंतर तिची प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. माधुरीला ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये दाखल करण्यात आले होते. …

Read More »

२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा शतकपूर्ती सोहळा ठरणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात भरणार असून, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची निवड करण्यात …

Read More »

बैलाऐवजी पत्नीच्या खांद्यावर नांगराचे जू; लातूरमधील शेतकऱ्याची हृदयद्रावक परिस्थिती

  लातूर : देशाचा अन्नदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संघर्षाचे आणखी एक विदारक उदाहरण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात समोर आले आहे. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने एका शेतकऱ्याने पत्नीच्या खांद्यावर नांगराचे जू ठेवून शेत नांगरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील देओणी तालुक्यातील …

Read More »

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अखेर उलगडले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत शिताफीने तपास करत कर्नाटकातील तिघा आरोपींना अटक केली आहे. मयत महिलेची ओळखही सुरुवातीला अज्ञात असताना आणि तपासासाठी फारसे धागेदोरे नसतानाही पोलिसांनी केलेल्या तांत्रिक व बारकाईच्या तपासामुळे हा गुन्हा …

Read More »

जगबुडी नदीत पोहताना ४ सख्खे भाऊ बुडाले; तिघांचा दुर्दैवी अंत

  रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड आणि भोस्ते गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका युवकाला सुखरूप वाचवण्यात यश आले असून, या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार …

Read More »

राज्यातील कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर येथे १४ जून रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन

  कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्रातदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे अधिवेशन कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे १४ जून २०२६ रोजी होत आहे. या अधिवेशनामध्ये शासकीय ठेकेदारांच्या विविध समस्या, शासनाची धोरणे, विकास कामांमधील संधी तसेच फेडरेशनच्या भावी वाटचालीबाबत चर्चा आणि मार्गदर्शन केले …

Read More »