Sunday , June 7 2026
Breaking News

महाराष्ट्र

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ. राजेश क्षीरसागर

  कोल्हापूर (जिमाका) : इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल, गॅस) आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे …

Read More »

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

  कोल्हापूर (जिमाका) : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी,’ असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुसूचित …

Read More »

मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

  मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषद घेत केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून …

Read More »

मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन

  सांगली : महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. ते 85 वर्षाचे होते. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. परिणामी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार …

Read More »

कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी

  पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोहापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण, रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार …

Read More »

झीरो एफआयआर दाखल करण्याचा कर्नाटकला अधिकारच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर …

Read More »

भोंदू अशोक खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी ‘अघोरी’ विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

  नाशिक : नाशिकचा भामटा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याचे कुख्यात कारनामे एकामागून एक समोर येत आहे. अनेक महिला त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. त्यांचे 300 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहे. शोषणाच्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकारण्यांसोबत मिळून त्याने क्राइम सिंडिकेट चालवल्याचे हळूहळू …

Read More »

अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

  मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी बातमी हाती आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. अशोक खरातच्या अश्लील कृत्याने राज्यभरात संताप व्यक्त …

Read More »

निवृत्त शासकीय सहसचिव दादासाहेब उर्फ गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे निधन

ठाण्यात निधन झाल्याने निपाणी परिसरात हळहळ निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी दादासाहेब उर्फ गो. श्री.पंतबाळेकुंद्री यांचे सोमवारी (ता.१६ ) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिजीत आणि विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्यावर …

Read More »

१० मार्चला पुन्हा गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार – मुंबईतील सभेतून ठाम इशारा

  मुंबई (अर्जुन विष्णू जाधव) : करीरोड मुंबई येथील मधु दंडवते सभागृहात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने आयोजित केलेली गिरणी कामगार व वारसाची भव्य सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या सभेतून महाराष्ट्र सरकारला कडक शब्दात इशारा देण्यात आला की गिरणी कामगारांच्या घराचा, पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास १० मार्चला …

Read More »