Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला : एनसीबी

  मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते. सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने …

Read More »

ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर; नव्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली : राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत राज्यात नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु नये, असे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर पुढील सुनावणी आता 19 जुलैला होणार आहे. …

Read More »

अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, ढगफुटीमुळे लंगर आणि तंबू गेले वाहून, 10 जणांचा मृत्यू

अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात काही लंगर …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या, अंदाधुंद गोळीबार करून हल्लेखोर पळाले

कोलकात्ता : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात आज टीएमसी नेते स्वपन माझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या, त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हे तिहेरी हत्याकांड घडले. काही गुंडांनी मोटारसायकल थांबवून अंदाधुंद गोळीबार …

Read More »

पीटी उषा, वीरेंद्र हेगडे यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर वर्णी

नवी दिल्ली : धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलैय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे …

Read More »

मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केंद्रीय अल्‍पसंख्‍याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्‍यापूर्वी त्‍यांनी भाजप अध्‍यक्ष जे. पी. नड्‍डा यांची त्‍यांनी भेट घेतली. दरम्‍यान, नक्‍वी यांना लवकर मोठी जबबादारी देण्‍यात येईल, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे. मात्र याबाबत नक्‍वी यांनी अधिकृतपणे विधान केलेले नाही. नक्‍वी हे राज्‍यसभा …

Read More »

कोरोनावरील देशातील पहिली टॅबलेट ‘सीडीएल’च्‍या परीक्षणात पास, आता होणार क्‍लीनिकल ट्रायल

नवी दिल्ली : कोरोना रुग्‍णसंख्‍येमधील चढ-उतार कायम असताना एक गूड न्‍यूज समोर आली आहे. देशातील पहिली कोरोनावरील टॅबलेट ही केंद्रीय औषध प्रयोगशाळाने (सीडीएल) घेतलेल्‍या गुणवता आणि क्षमता परीक्षणात पास झाली आहे. आता या टॅबलेटची क्‍लिनिकल ट्रायल होणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनावरील टॅबलेट ही बंगळूरमधील सिनजिन कंपनीने अमेरिकेवरुन आयात केली …

Read More »

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता १,०५३ रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. तर ५ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर १८ रुपयांनी महागला …

Read More »

उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान

नवी दिल्ली : राज्यातील सत्तानाट्य पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे नियुक्त शिवसेनेच्या मुख्य प्रतोदच्या व्हीपला मान्यता देण्याचा नवनिर्वाचित महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला याचिकेतून आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती इंदिरा बनर्जी आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या अवकाशकालीन खंडपीठासमक्ष वरिष्ठ वकील अभिषेक मनु …

Read More »

नुपूर शर्माने देशाची माफी मागावी; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या …

Read More »