Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

भारताची एकदिवसीय क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर भक्कम पकड

  नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम केले असून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर पकड भक्कम झाली आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी भारताला मागे टाकणे कठीण असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाणार!

  मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दिल्ली असल्याचं सत्ता स्थापनेच्या वेळी लक्षात आलंच. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बर्‍याचदा दिल्ली दौरा केला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहे. एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी ते …

Read More »

अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर

  बेळगाव : शिक्षण खात्याने राज्यात 15 हजार शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी शिक्षण खात्याने सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किती शिक्षकांनाही गरज आहे याचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांची माहिती जमा करण्यात आली असून अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर …

Read More »

पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट

  कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी पाऊस कमी झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 36 फुट 5 इंचावर आहे. जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. मात्र, सध्या कोणताही मोठा रस्ता …

Read More »

माजी मंत्री रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. “माझ्यावर अनेकदा …

Read More »

प्रदूषणकारी एसबीओएफ खत कारखाना बंद करण्याची मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …

Read More »

खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …

Read More »

अथणीत आढळले दुर्मिळ रानमांजर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दुर्मिळ रानमांजर आढळल्याने खळबळ माजली आहे. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात काल, रविवारी रात्री रानमांजर सदृश्य प्राणी आढळल्याने खळबळ माजली आहे. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला बिबट्याचे पिल्लू असल्याचे म्हटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याची माहिती …

Read More »

वृंदा करात यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर

  सांगली : येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी कॉम्रेड वृंदा करात यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह लोक विद्यापीठाचे संघटक कॉम्रेड सुभाष पाटील आणि सचिव कॉम्रेड सुभाष पवार यांनी दिली आहे. याबाबत कॉम्रेड पाटील म्हणाले, येत्या 6 ऑगष्ट रोजी दुपारी 1.30 …

Read More »

येळ्ळूर येथे दरवर्षीप्रमाणे दहीकाला संपन्न

  बेळगाव : आषाढी एकादशीची पंढरपूर वारी संपवून वारकरी गावामध्ये आल्यानंतर दहीकाला कार्यक्रम आयोजित केला जातो. ही दहीहंडी गावातील हक्कदार यांच्या घरातून वाजत गाजत श्रीहरी विठ्ठलाच्या जयघोषात आनंदाने श्री चांगळेश्वरी मंदिरकडे आणले जाते व मंदिरसमोर सर्वांच्या उपस्थित दहीकाला हंडी मानाच्या लाकडाच्या ओडक्याला बाधून सभोवती फिरवली जाते व गावातील नागरिकांच्यावतीने दहीहंडी …

Read More »