Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पथ संंचलनात भाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षा

  बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भाग घेतल्याबद्दल वर्गाबाहेर उभा करून शिक्षा देण्यात आली. याबद्दल शहरात संतापाची लाट उसळली आहे. कॅम्प मधील नावाजलेल्या या शाळेत सोमवारी शाळेच्या टीचरने त्या विद्यार्थ्यांचा फेसबुक वरील व्हिडिओ आणि …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »

डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांच्या कवितासंग्रह ‘दहलीज… एक सीमा’ चे प्रकाशन

  बेळगाव : दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाच्या हैद्राबाद, खैरताबाद येथे स्थित पापन्न गुप्ता हॉलमध्ये डॉ. दत्तात्रय देसाई यांच्या ‘दहलीज… एक सीमा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन अत्यंत गौरवशाली वातावरणात पार पडले. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाचे अध्यक्ष श्री पी. ओबय्या यांच्या अध्यक्षतेखाली हा …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो खो, कबड्डी स्पर्धेचे 18 ऑक्टोबर रोजी आयोजन

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे …

Read More »

बैलूरसह चार गावांची महालक्ष्मी यात्रा; परंपरेनुसार पालवे सोडण्याचा विधी भक्तिमय वातावरणात संपन्न

  बैलूर (ता. खानापूर) : मार्कंडेय नदीच्या उगमस्थानी वसलेल्या खानापूर तालुक्यातील बैलूर या गावात मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पारंपरिक पालवा सोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मे 2026 या वर्षी बैलूरसह बाकनूर, मोरब आणि देवाचीहट्टी या चार गावांची मिळून महालक्ष्मी देवीची यात्रा भरवण्यात …

Read More »

दसऱ्याच्या वाढीव सुट्टीमुळे निपाणी परिसरात गड, किल्ले तयार करण्यात बालचमू व्यस्त

  निपाणी (वार्ता) : यावर्षी शिक्षण खात्याने दसऱ्याची वाढीव सुट्टी दिल्याने निपाणी शहराच्या ग्रामीण भागातील रिकामे असलेले बालचमू चार-पाच दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले होते. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर सैनिक ठेवण्यासह विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत. यंदा ३४ पेक्षा …

Read More »

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास यश निश्चित : अनंत लाड

  बेळगाव : “खर्चीलेला पैसा, संपत्ती, ज्ञान पुन्हा मिळवता येते पण गेलेला वेळ कोणालाही परत आणता येत नाही. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या मराठ्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. वेळेचे नियोजन करून आपल्या उद्योग व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास अपयश कधी येणार नाही” असे …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांची शांताई वृध्दाश्रमाला भेट!

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबांच्या सहवासात मनमुराद आनंद लुटला. महिला व पुरुष अशा जवळपास 40 सभासदांनी गाणी गाऊन व नृत्य केले यावेळी वृध्दाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सर्वच सभासद समरस झाले होते.डॉ. बी.जी.शिंदे यांनी गाजलेल्या शोले …

Read More »

मिरजमध्ये तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पैकी एक जण …

Read More »

शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम …

Read More »