Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

कंत्राटी कामगाराचा फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न!

  बेळगाव : रायबाग तहसीलदार कार्यालयातील कंत्राटी कामगाराने वकिलाच्या छळाला कंटाळून फेसबुकवर लाईव्ह येत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हालप्पा सुराणी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून वकिलाच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ते पाहून त्याच्या पत्नीने देखील विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. …

Read More »

हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली

  खानापूर : हब्बनहट्टी (जांबोटी ता. खानापूर) येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ओढे-नाले आणि नद्यांचे प्रमाणाबाहेर पाणी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. …

Read More »

खानापूर तालुक्यात धुवांधार पाऊस; हालात्री पुलावर पाणी, मणतुर्गा पुल वाहतुकीला बंद

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध भागात धुवांधार पावसाने मंगळवारी रात्री पासून हजेरी लावली. त्यामुळे हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवर तीन फुट पाणी आल्याने तसेच मणतुर्गा पुलावर पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी रूमेवाडी क्राॅसवर फलक लावून हेम्माडगा मार्ग वाहतुकीला बंद असल्याचे सांगितले आहे. कोणी येथून प्रवास करू नये असे आवाहन केले …

Read More »

बेंगळुरूमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक

  बेंगळुरू: बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सय्यद सुहेल, उमर, जुनैद मुदशीर, जाहिद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयितांनी बंगळुरूसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्याची योजना आखली होती. यातील एक आरोपी जुनैद फरार झाला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये आरटी नगरमध्ये …

Read More »

मतिमंद मुलाचा खून करून बापाने मृतदेह फेकला मलप्रभा नदीत!

  खानापूर : मतिमंद मुलामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाच्या लग्न जमत नाही अशा भीतीने बापानेच मतिमंद असलेल्या मोठ्या मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खूनाचा तपास केवळ वीस दिवसात खानापूर पोलिसांनी केला आहे. निखिल राजकुमार मगदूम (२५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) असे …

Read More »

दमदार सरींनी बळीराजाला दिलासा

  खरीप हंगामाला चैतन्य; हिरवी स्वप्ने डोळ्यात साठवून शेती कामांची वाढली लगबग निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यामध्ये एकही वळीव पाऊस झाला नाही. त्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वांनाच संभ्रमात टाकले होते. मृग सरी कोसळून पुन्हा लुप्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पण आता पुन्हा निपाणी शहर आणि ग्रामीण भागात …

Read More »

फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

  बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे …

Read More »

कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

  कोल्हापूर : रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस जेमतेम आठवडाभर टिकला. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात असताना गेले …

Read More »

निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्षपदी बंडा पाटील

  कार्याध्यक्षपदी अजित पाटील; उपाध्यक्षपदी संतोष निढोरे निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग कार्यकारिणी व पदाधिकारी पुनर्चना करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटील होते. यावेळी अध्यक्षपदी बंडा पाटील -मतिवडे, कार्याध्यक्षपदी अजित पाटील -कुर्ली, उपाध्यक्षपदी संतोष निढोरे, सरचिटणीसपदी अमोल …

Read More »

खानापूरच्या वाजपेयी नगरातील समस्या सोडवा; तहसीलदाराना निवेदन

खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन वाजपेयी नगरातील रहिवाशांनी भाजप नेत्यांच्या नेतृत्वखाली तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देऊन समस्या सोडवा अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, वाजपेयी नगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही. …

Read More »