Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

अशोकनगरमधील ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे उद्घाटन…

  बेळगाव : बेळगावच्या अशोकनगरमध्ये तयार करण्यात आलेल्या महानगरपालिका संचालित ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण करण्यात आले. बेळगावच्या अशोकनगरमध्ये फिरोज सेठ आमदार असताना ऑलिंपिक दर्जाचा हा जलतरण तलाव उभारण्यात आला होता. आज उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, नगरसेवक रियाझ किल्लेदार, महानगरपालिका आयुक्त शुभा बी. आणि इतर …

Read More »

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची गर्दी

  बेळगाव : काही त्रुटींमुळे बेळगावच्या खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’ची परवानगी कृषी संचालकांनी रद्द केल्याने, आजपासून ‘जय किसान भाजी मार्केट’ने आपला व्यवसाय थांबवला. त्यामुळे पहाटेपासूनच मोठ्या संख्येने शेतकरी आपली उत्पादने बेळगावच्या सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन आले. शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी सरकारी एपीएमसीमध्ये भाजीपाला उत्पादने घेऊन आलेल्या …

Read More »

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  दसरा चौकात 22 सप्टेंबरला शुभारंभ, देश-राज्यातील पर्यटक-भाविकांना भेटीचे आवाहन कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यास अनेक शतकांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे शाही दसरा महोत्सव नवरात्र कालावधीदरम्यान आयोजित करण्यात येतो, ज्यामध्ये विविध सांस्कृतिक …

Read More »

“जय किसान” भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांचे आंदोलन…

  बेळगाव : राज्य सरकारने जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांनी सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आंदोलन केले. बेळगावातील खासगी जय किसान मार्केटमधील 300 दुकानांचे व्यापारी आणि कामगार ए.पी.एम.सी. परवानगी रद्द झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दहा वर्षांसाठी ‘ट्रेडिंग लायसन्स’ (व्यापार …

Read More »

गुंजी ग्रामपंचायतचा सावळागोंधळ; काँक्रीटवर पुन्हा पेव्हर्स घालण्याचा प्रकार!

  सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मादार यांची तालुका पंचायतला तक्रार खानापूर : मागील तीन-चार वर्षांपूर्वी गुंजी ग्रामपंचायतच्या आवारात काँक्रिटीकरण करून सुसज्य रस्ता व परिसर सुंदर करण्यात आला आहे असे असताना याच काँक्रिटीकरणावर पुन्हा लाखो रुपये खर्च करून पेव्हर्स बसवण्याचा घाट गुंजी ग्रामपंचायतने घातला आहे. नुकताच या पेव्हर्स बसवण्याच्या कामाचे पूजनही ग्रामपंचायत …

Read More »

ईद – मिलाद मिरवणुकीतील उर्दू-इंग्रजी बॅनरवरून करवेचा महापालिकेत धुडगूस

  बेळगाव : बेळगावमध्ये सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहत असताना जाणीवपूर्वक सीमाभागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. नुकताच झालेल्या गणेशोत्सव व ईद-मिलादच्या काळात शुभेच्छा फलकांवर मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्याचा आरोप करत करवेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका कार्यालयात जाऊन धुडगूस घातली असून त्यांच्या या कृत्याने बेळगाव …

Read More »

धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी” आणि मातृभाषा “मराठी” अशी नोंद करावी : आमदार विठ्ठल हलगेकर

  खानापूर : २२ सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात जातनिहाय जनगणना सर्वेक्षण सुरू होणार असून खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने स्वत:ची माहिती देतांना धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी” आणि मातृभाषा “मराठी” असा उल्लेख सर्व मराठा बांधवांनी करावा असे आवाहन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. आज येथील शिवस्मारकात सकल मराठा …

Read More »

हंदूर येथे अज्ञातांनी दोन दुचाकी जाळल्या…

  खानापूर : काल रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर लावलेल्या दोन दुचाकी एक होंडा व दुसरी सुझुकी अशा दोन दुचाकी जळून खाक झाल्या असून अज्ञात व्यक्तींनी हे दुष्कृत्य केले आहे. सद्दाम अस्लम सय्यद यांच्या या दोन दुचाकी होत्या. समजा घराने पेट घेतला असता तर मात्र अजून जास्त अनर्थ घडला …

Read More »

काँग्रेस आमदार नंजेगौडांची निवडणूक उच्च न्यायालयाने केली रद्द; फेर मतमोजणीचे आदेश

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांची निवडणूक रद्द केली आणि २०२३ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत टाकलेल्या मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले. नंजेगौडा यांच्याविरुद्ध पराभव झालेल्या भाजपच्या के. एस. मंजुनाथ गौडा यांनी दाखल केलेल्या निवडणूक वाद याचिकेवर सुनावणी …

Read More »

अप्पर कृष्णा प्रकल्प टप्पा-३ च्या अंमलबजावणीला प्राधान्य : सिध्दरामय्या

  नुकसान भरपाई प्रति एकर ४० लाख, अलमट्टीच्या उंचीची अधिसूचना जारी करण्याची मागणी बंगळूर : काँग्रेस सरकारने अप्पर कृष्णा प्रकल्प (युकेपी) टप्पा-३ च्या जलद अंमलबजावणीला प्राधान्य देऊन राज्याची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. बागायती जमिनीला प्रति एकर ४० लाख रुपये आणि …

Read More »