Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मराठी कागदपत्रांसाठी बेळवट्टी ग्राम पंचायतीला निवेदन

  बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये कन्नड बरोबर मराठी कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार बेळवट्टी येथेही निवेदन देण्यात आले. युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, बेळवट्टी …

Read More »

घुबडाला जीवदान!

  बेळगाव : रात्रभर पतंगाच्या मांजात पंख अडकून पडलेल्या घुबडाची सुखरूप सुटका नागरिकांनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलने करून घुबडाला जीवदान दिले. शहापूर आचार्य गल्ली येथे एका घराच्या छप्परावर मांजात पंख अडकून जखमी झालेले घुबड पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पाहिले. नंतर आचार्य गल्लीतील गोपी गलगली, नरेंद्र बाचीकर आणि विलास अध्यापक यांनी छप्परावर …

Read More »

खानापूर आम आदमीकडून अग्निपथाला विरोध

  अध्यक्ष भैरू पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारकातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आज बैठक

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 6-00 वाजता सिद्ध भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर पाटील गल्ली (शनी मंदिर समोर) बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस महादेव पाटील, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण – …

Read More »

भारताचा पाकवर 5 गड्यांनी दणदणीत विजय

  दुबई : आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 5 विकेट्स राखून पाकिस्तानच्या संघाला धुळ चारली. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब …

Read More »

रिंगण सोहळ्याने निपाणी नगरी दुमदुमली!

  वारकरी, भाविकांचा उत्साह : माऊली, माऊलीचा गजर निपाणी (वार्ता) : टाळ मृदंगाचा गजर, हातात पताका, विणेकरी, चोपदार, पालखी सोहळा, आणि माऊली माऊली च्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अंकली येथील अश्वांचे येथील म्युनीशिपल हायस्कूलच्या पटांगणावर रविवारी (ता.२८) दुपारी प्रथमच श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत …

Read More »

बरगावच्या इसमाचा अपघातात मृत्यू

  खानापूर : पारीश्वाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर पारीश्वाड रस्त्याच्या नाल्यावरील पुलाजवळच्या खड्ड्यामुळे रविवार दि. २८ रोजी बरगावच्या तरूणाचा बळी गेला. अमृत शंकर देसाई (वय ४२) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमृत देसाई हे रविवारी रात्री 7 च्या सुमारास दुचाकीने खानापूरहून आपल्या गावी बरगावला निघाले होते. या दरम्यान खानापूर-पारीश्वाड रस्त्याच्या निट्टुर …

Read More »

स्वामीविरुद्धच्या प्रकरणी चौकशीतून सत्य बाहेर येईल; मुख्यमंत्री बोम्मईना विश्वास

  बंगळूर : चित्रदुर्गातील एका प्रमुख मठाच्या मुख्य स्वामींचा समावेश असलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, ज्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी सांगितले. तथापि, चौकशी सुरू असल्याने त्यांनी स्वामीजी आणि प्रकरणावरील आरोपांबद्दल इतर कोणतीही टिप्पणी …

Read More »

प्रेरणादायी निळकंठराव सरदेसाई; ज्येष्ठ नेते दिगंबर पाटील यांचे उदगार

खानापूर : तालुक्यातील जनतेला रोजगार आणि विकासाचा दूरदृष्टीकोण ठेवून भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करणारे माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी व्हावे, हा दृष्टिकोन ठेवत महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला साखर कारखान्याने त्यांचा पुतळा कारखान्याच्या आवारात स्थापन करण्याचे ठरविले आहे. यास खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्ण …

Read More »

हिंगणगाव येथे उद्या शांतिसागरजी महाराजांची पुण्यतिथी

रावसाहेब पाटील यांची माहिती: विविध कार्यक्रमाचे आयोजन निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी महोत्सव हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) सोमवारी (ता. २९) होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे …

Read More »