Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू

  बेळगाव : रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू झाला. हा अपघात बेळगाव शहरातील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे गेट दरम्यान सोमवारी रात्री घडला. रेल्वेने धडक दिल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. माहिती मिळताच महामंडळाचे स्वच्छता निरीक्षक गणाचारी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून गायींचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Read More »

हिंडलगा हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

  बेळगाव : हिंडलगा येथील हिंडलगा हायस्कूलच्या 1987-88 सालच्या बॅचमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन तब्बल 34 वर्षानंतर सोमनाथ लॉन, बॉक्साइट रोड हिंडलगा येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडले. हिंडलगा हायस्कूलच्या सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटितपणे स्वखर्चातून शाळेच्या नूतन इमारतीची रंगरंगोटी करण्याद्वारे शाळेबद्दलची आपली आत्मीयता प्रकट केली. या रंगरंगोटी केलेल्या शाळा …

Read More »

सीमाप्रश्नी पुन्हा तारीख पे तारीख

  बेळगाव : 23 नोव्हेंबर रोजी होणारी सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सीमाप्रश्नी खटल्याचा समावेश होणार नाही. संपूर्ण सीमावासीयांचे लक्ष उद्या होणाऱ्या निकालाकडे होते. अनेक समितीप्रेमी हा निकाल “याची देही याची डोळा” पाहता, ऐकता यावा म्हणून दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टात या खटल्यावर …

Read More »

ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर

  बेळगाव : ट्रकची धडक बसून रस्त्यावरून जाणारा पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना छ. शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोडवर सकाळी 7 च्या दरम्यान घडली. श्रीराम स्वामी (रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. तसेच आपल्या …

Read More »

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने सौहार्दता राखली पाहिजे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  बेंगळुर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते नक्की पार पडेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, जत तालुका हा तीव्र दुष्काळग्रस्त तालुका आहे. त्यांना मी सर्व …

Read More »

मंगळूर ऑटो बॉंब स्फोट प्रकरण; संशयित आरोपी दहशतवादी संघटनेने प्रेरित

  महासंचालक आलोक कुमार, शारिकच्या खोलीत सापडली स्फोटके बंगळूर : ऑटो रिक्षा प्रकरणातील गूढ स्फोटातील संशयित शारिक याला एका दहशतवादी संघटनेने कट्टरपंथी बनवले होते, असे कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस कायदा व सुव्यवस्था महासंचालक आलोक कुमार यांनी सोमवारी मंगळूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शारिक हा जागतिक दहशतवादी संघटनेने “प्रभावित आणि प्रेरित” होता, …

Read More »

चाबूक मोर्चाच्या पाठिंब्यासाठी बार असोसिएशनला विनंती

  बेळगाव : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगावच्या नियोजित रिंगरोड विरोधात येत्या सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य चाबूक मोर्चाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी विनंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव बार असोसिएशनला करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंगरोडचा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी येत्या …

Read More »

सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन

  सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्याकडे जबाबदारी

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या संदर्भात मुंबई येथे झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी पुढील हालचालीसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ …

Read More »

खानापूर-अनमोड रस्ता निकृष्ट दर्जाचा

  खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर- रामनगर, अनमोड -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ कायद्याच्या चौकटीत अडकून पडला होता. तो रस्ता आता पुन्हा करण्यात येत आहे. मात्र रस्ता करण्यासाठी मोहरम ऐवजी साधी माती वापरण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे सर्वत्र धूळ उडत आहे यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन …

Read More »