संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरत आज सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावलेली दिसली. दिवसभरातील कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या संकेश्वरकरांना सायंकाळच्या पावसाने मस्तपैकी गारवा मिळवून दिलेला दिसला. संकेश्वरकरांना यंदा अजब ऋतू पहावयास आणि अनुभवयास मिळाला आहे. बारा महिन्यातील पावसाळ्याचे चार नव्हे तर आठ महिने संकेश्वरकरांच्या वाटेला आले आहेत. संकेश्वरात हिंवाळा आणि आता उन्हाळा देखील पावसाचाच वाटू लागला आहे. यापूर्वी संकेश्वरातील नागरिकांना होळीनंतर पावसाच्या सरी पहावयास मिळायच्या. यंदा मात्र होळीपूर्वीच पावसाचे आगमन झालेले दिसत आहे. आठवडाभरात उन्हाचा तडाखा वाढल्याने लोक गरमीने परेशान झाले होते. आज पावसाच्या सरी अंगावर झेलत कांही नागरिक उष्मा घालवितानाचे चित्र पहावयास मिळाले. संकेश्वरातील जाणकार लोक सांगताहेत संकेश्वरात प्रथमच ऋतूचक्र बदलले आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …