Saturday , July 27 2024
Breaking News

Belgaum Varta

सांगलीला पुराचा धोका, कोल्हापूर शहरात पाणी शिरले; एनडीआरएफची टीम तैनात

  सांगली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झाले असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा …

Read More »

अतिवृष्टीमुळे उद्याही शाळा – महाविद्यालयांना सुट्टी

  बेळगाव : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी (२७ जुलै) शाळा-पदवी पूर्व कॉलेजना सुट्टीची घोषणा केली आहे. रामदुर्ग तालुका वगळता सर्व तालुक्यांतील सर्व अंगणवाडी केंद्रे, शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि पूर्व पदवी महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षक कार्यशाळेचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाटक व कथाकथन या माध्यमांचा मराठी अध्यापनात कशाप्रकारे वापर करावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर.पी.डी महाविद्यालयाचे मराठी विभाग …

Read More »

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने

  मांगुर फाट्यावरून वाहतूक बंद; पोलिसासह महसूल विभाग घटनास्थळी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. शिवाय महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी शालिनी रजनीश यांची नियुक्ती

  बेंगळुरू : राज्य सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत आणि शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या पत्नी शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या पुढील मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री …

Read More »

माजी सैनिक संघटना संघटनेतर्फे कारगिल विजयोत्सव

  बेळगाव : माजी सैनिक संघटना संघटनेने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करून भारताच्या स्वाभिमानासाठी आणि सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या निर्भीड योद्ध्यांना आदरांजली वाहिली. डॉ. सोनाली सरनोबत यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दोन मिनिटे स्तब्धता पाळून आणि हुतात्म्यांना अभिवादन करून झाली. डॉ. …

Read More »

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

  मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या बेळगाव : जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (26 जुलै) खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली. जांबोटी रोडवरील कुसमळी पूल, त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल : पंकज गाडीवड्डर यांचे पत्रक

  निपाणी (वार्ता) : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील शहरासह उपनाराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसात तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हा तलाव भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे तलावातील गाळ काढला असता तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण …

Read More »

धो धो पावसातच नेला “त्या” दुर्दैवी महिलेचा मृतदेह आणि केले अंत्यसंस्कार..

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षदा …

Read More »

ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : मनोज जरांगे पाटील

  मुंबई : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजाला मोठे करायचे असेल तर सर्वांनी एकत्र …

Read More »