Friday , April 17 2026
Breaking News

Belgaum Varta

मनगटात शिवराय आणि डोक्यात भिमराव जर असतील तर कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही : शुभम शेळके

  तुडये : भीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी केलं, शिवराय ते भीमराव, …

Read More »

सीमा प्रश्नासंदर्भात समिती कार्यकर्त्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

  बेळगाव : 22 वर्षे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला खादरवाडी येथील समिती कार्यकर्ते प्रकाश नेसरकर यांनी एक पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून संबंधित प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका सामान्य समिती कार्यकर्त्याच्या पत्रामुळे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याने बेळगाव …

Read More »

रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युतीसंदर्भात खानापूर काँग्रेस ब्लॉकतर्फे तहसिलदारांना निवेदन

  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आज रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युती संदर्भात खानापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी म्हणाले की, तालुक्यातील जनतेने विचारवंत, शिक्षक, शिक्षित उच्चशिक्षित, वारकरी, समाजप्रबोधनकार यांना प्रबोधन करण्यासाठी बोलवावे ना की रौडीशिटर ना. समाज म्हणून …

Read More »

महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांसाठी 12 मे रोजी मतदान

  मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि …

Read More »

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहतर्फे श्री छत्रपती शिवाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या संयोजनाखाली म्युनिसिपल मैदानावर आयोजित ‘अरिहंत चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मांगले (जि.सांगली) येथील संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते २ लाखाचे रोख …

Read More »

योगेश गौडा खून प्रकरणी माजी मंत्री विनय कुलकर्णी दोषी

  लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचा निर्णय बंगळूर : भाजपचे नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह इतर आरोपींना दोषी ठरवण्याचा आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल जाहीर केला. शिक्षेचे प्रमाण उद्या (ता. …

Read More »

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : श्री आदिचुंचनगिरी मठाने मांडलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या नऊ तत्त्वांचे पालन केल्यास ‘विकसित भारत’चा मार्ग अधिक सोपा आणि व्यवहार्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नागमंगल तालुक्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करताना त्यांनी …

Read More »

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता बैठकीत रौडीशीटरची उपस्थिती आढळून आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. आहे. खानापूर तालुक्यातील पोलीस विभागाच्या कारभारावर सध्या वादंग निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित पूर्वतयारी शांतता बैठकीत रौडीशीटरला सहभागी करून घेतल्याच्या घटनेमुळे …

Read More »

कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात तब्बल 43 वर्षांनंतर 28 एप्रिल रोजी महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी ही एक यात्रा ठरणार आहे. यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. यात्रेदरम्यान दररोज सुमारे एक ते दीड लाख भाविक गावात …

Read More »

पुन्हा वाजणार सनई-चौघडे

  एप्रिलच्या उत्तरार्धात आठ योग; अधिकमासात लागणार ‘ब्रेक’ निपाणी (वार्ता) : प्रतीक्षेनंतर पुन्हा लग्नाचा बार उडणार असून सनई-चौघड्यांचा आवाज कानी पडणार आहे. एप्रिलमध्ये बुधवारपासून (ता. १५) शुभ मुहूर्तांना पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यानंतर लग्नसोहळ्यांना प्रारंभ होणार आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात आठ मुहूर्त आहेत. १६ मार्चपासून लग्नासाठी शुभमुहूर्त नव्हते. अर्थात हा महिनाभराचा …

Read More »