बेळगाव : सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी-पिरनवाडी रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग 54) अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांबोटी (राज्य महामार्ग 31) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी करण्यात आल्या आहेत. खानापूरहून जांबोटीकडे जाण्यासाठी सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत एकेरी प्रवास करतील आणि जांबोटीहून ते खानापूरकडे जाण्यासाठी दुपारी १ ते रात्री ८ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.