Sunday , September 8 2024
Breaking News

देश/विदेश

६४ कोटी लोकांनी बजावला मतदानाचा हक्क; मतमोजणीची तयारी पूर्ण

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं आहे. तसंच यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला …

Read More »

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून १३ जण जागीच ठार

  मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिला पुरुष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. स्थानिकांकडून अपघाताची माहिती …

Read More »

आईने केली पोटच्या ४ मुलांची हत्या; स्वत:लाही संपवण्याचा केला प्रयत्न

  राजस्थानमध्ये एका आईने आपल्या चार लेकरांची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. महिला आत्महत्या करताना शेजारच्या एका व्यक्तीने तिला पाहिले. त्यानंतर त्याने आरडाओरडा करुन सर्वांना बोलावले. आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक घटनास्थळी पोहचले. लोकांनी महिला आणि तिच्या …

Read More »

प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; पाच चिमुकल्यांसह ७ जणांचा मृत्यू

    मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. श्योपूर जिल्ह्याच्या सिप नदीत ११ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या दुर्घटनेत पाच चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या …

Read More »

सुनीता विल्यम्स यांची गगनझेप अपयशी!

  नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत. बोईंग स्टारलाईनर …

Read More »

अखेरच्या टप्प्यात ६०.३७ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी ६०.३७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीस उभे असून या मतदारसंघात ५६.३५ टक्के …

Read More »

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा मोदी सरकार!

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहे, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे. लोकसभा …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा आज पार पडत आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणौत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत कौर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. अशातच पश्चिम बंगालमधून मतदानावेळी हिंसाचाराचे वृत्त येत आहे. तृणमूल …

Read More »

“४६ सेकंदात २० अँगल… कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?”; विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

  सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद दगडी स्मारकाच्या ध्यानमंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान केलं. १८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी हे ध्यान करत होते. प्रसिद्ध विवेकानंद दगडी स्मारकाच्या ‘ध्यान मंडपम’ येथे भगव्या रंगाच्या पोशाखात ध्यान करताना पंतप्रधान मोदींचे फोटोही …

Read More »

जम्मू-काश्मीर : अखनूरमध्ये बस दरीत कोसळल्याने 21 ठार, 40 जखमी

  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील जम्मू-पूंछ महामार्गावर अखनूर येथे प्रवासी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. गुरुवारी (दि. 30) घडलेल्या या दुर्घटनेत 21 प्रवाशांचा मृत्यू झाले असून 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू …

Read More »