Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : एकनाथ शिंदे भाजप सरकारचा खाते वाटपाचा कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर फडणवीस आज (दि.५) नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात पूर व्यवस्थापन आढावा बैठक; पूरस्थिती उद्भवल्यास आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा; सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरध्वनीद्वारे सद्यस्थितीची माहिती घेत असून “पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एनडीआरएफच्या 2 तुकड्या आज रात्री जिल्ह्यात दाखल होत आहेत, …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली …

Read More »

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा दक्षता पथक (पीसीपीएनडीटी) बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. …

Read More »

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पातळी २४.५ फुटांवर

कोल्‍हापूर : जिल्ह्यात साेमवार (दि. ४) पासून पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात १० फुटाने वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची पातळी 24.5 फुटावर गेली असून, जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर …

Read More »

कोकणात जोरदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा; भुजबळांमुळे रहावे लागले ४० दिवस जेलमध्ये

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी राजकीय प्रवास आणि कौटुंबिक माहिती देत मला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटले. …

Read More »

अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड!

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य …

Read More »

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा! : उद्धव ठाकरे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या …

Read More »

शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला!

मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी …

Read More »