Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून वासुदेव हरी टोपले यांचे मरणोत्तर नेत्रदान

बेळगाव : मूळचे सावंतवाडी येथील वासुदेव हरी टोपले यांचे बेळगाव येथे येळ्ळूर केएलई इस्पितळात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांना माहिती मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला व मध्यरात्री त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात …

Read More »

मराठा बँकेचा बुधवारी अमृत महोत्सव; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उपस्थिती

चेअरमन दिगंबर पवार यांची माहिती बेळगाव : बेळगाव परिसरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बुधवार दिनांक 11 मे रोजी मराठा बँकेचा अमृत महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेद्वारे होणाऱ्या, कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित …

Read More »

तेलंगणा येथे भीषण अपघातात 9 ठार, 17 गंभीर जखमी

तेलंगणा : तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जण जागीच ठार झाले असून, 17 जण गंभीर जखमी आहे. जखमींना बांसवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिटलम तालुक्यातील चियालर्गी गावातील ग्रामस्थ नातेवाईकांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी केले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर परताना पिकअपने भरधाव ट्रकला …

Read More »

कर्नाटक : सर्व एक्स्प्रेससाठी तिकीट काऊंटर सुरु; दोन वर्षांनंतर प्रतीक्षा संपली

बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी आता तिकीट काऊंटर सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ दोनच एक्स्प्रेस गाड्याना रेल्वेचा प्रवासी तिकीट आणि मासिक पास सुरु करण्यात आला होता. आता पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे. मे महिन्यापासून टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट …

Read More »

वर्ग मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा निर्धार

1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कोगनोळी : पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व वर्ग मित्रांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्धार करत 1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामचंद्र नवाळे होते. विनायक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित शिक्षक ए. यु. कमते, कुलकर्णी, ए. पी. …

Read More »

सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश वितरण

बेळगांव : बेळगांव शहरामध्ये दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी मुसळधार पाऊस व वादळामुळे अंगावर झाड पडल्याने काळी अमराईतील प्रमुख कै. श्री. विजय कोल्हापुरे यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून रु. 5,00,000/- (रु. पाच लाख) चा भरपाईचा धनादेश आमदार अनिल बेनके यांनी दिला. यावेळी आमदार अनिल बेनके …

Read More »

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादची महाविजेती ठरली शुद्धी कदम

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे …

Read More »

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जागतिक थलसमिया दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर महावीर ब्लड बँक रेडिओ कॉम्प्लेक्स बेळगांव येथे भरविण्यात आले होते. जायंट्स परिवाराच्या सदस्यांनीही रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला. यावेळी महावीर ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉ. यलबुर्गी यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. रक्तदान शिबिरात जिव्हाळा …

Read More »

बेळगावसह परिसरात “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात जनजागृती

बेळगाव : बेळगावसह परिसरात बहुसंख्य मराठा समाज आहे. तो सर्वत्र विखुरलेला आहे. मात्र आता हाच मराठा समाज एकवटत आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी एकसंघ होत आहे. मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते सज्ज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 15 मे रोजी मराठा समाजाच्यावतीने …

Read More »

‘दास्य मुक्तीकडून संघर्षाकडे’ उपक्रमात २०० कार्यकर्ते

डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजन : महाड- रायगडला रवाना निपाणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त एक वैचारिक संदेश समाजाला मिळावा  यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यावर प्रस्थापित वर्ण व्यवस्थेने हक्क नाकारला होता. तो आमचा नैसर्गिकदृष्ट्या अधिकार आहे हे सांगण्यासाठी व समता प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी …

Read More »