Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

भ्रष्टाचाराची पीएचडी काँग्रेस सरकारचा नवा कोर्स; भाजपचा गंभीर आरोप!

  बेळगाव : दूध ते दारूपर्यंत दरवाढ करणे हेच काँग्रेस सरकारचे एकमेव यश आहे. भाजप याविरोधात गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने आंदोलन करत असून, येत्या काळात जनता काँग्रेस सरकारला योग्य धडा शिकवेल, असे अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले. आज बेळगाव येथे भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस सरकारच्या अपयशाचे …

Read More »

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले स्वच्छ करा : महापौर पवार यांचे महानगरपालिका अधिकाऱ्यांना आदेश

  बेळगाव : शहरातील गटारी आणि नाला स्वच्छतेसाठी सुरू केलेले काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना महापौर मंगेश पवार यांनी दिल्या. महापौर मंगेश पवार बुधवारी महापालिका सभागृहात पावसाळी समस्येवर उपाय म्हणून बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या सदस्यांना विश्वासात …

Read More »

संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणी बेळगावात हिंदू संघटनांचा जनआक्रोश मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली निरपराध हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करत आज बेळगाव येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेची योग्य चौकशी करण्याऐवजी निष्पाप हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ करण्याच्या …

Read More »

माजी महापौर सौ. नीलिमा चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन

  बेळगाव : भाग्यनगर क्रॉस 6 च्या निवासी, म. ए समितीच्या कार्यकर्त्या आणि बेळगावच्या माजी महापौर सौ. नीलिमा संभाजी चव्हाण (वय 60).यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक संभाजीराव चव्हाण, दोन कन्या व एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वा. चिदंबरनगर स्मशानभूमीत त्यांच्या …

Read More »

बिम्समध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू?

  बेळगाव : बिम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रात्री उशिरा एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगर येथील संपिगे रोड येथील रहिवासी प्रभावती विष्णू मिरजकर यांना १५ मे रोजी बिम्समध्ये उपचारासाठी दाखल केले होते. १९ तारखेला त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे।अतिदक्षता विभागात …

Read More »

कलाश्रीच्या सतराव्या भाग्यवान विजेत्या ठरल्या मनाली पाटील

  बक्षिसादाखल मिळाले अर्धा तोळा सोने कंग्राळी खुर्द – कलाश्री उद्योग समुहाच्या वतीने आयोजित चौथ्या योजनेतील सतराव्या ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या देवघनहट्टी च्या मनाली पी. पाटील ठरल्या. त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्धा तोळे सोने देण्यात आले. कलाश्री सभागृहात प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शीतल बर्डे (चेअरमन …

Read More »

कन्नड बोलो मॅडम, यह कर्नाटक है… एसबीआय मॅनेजर आणि ग्राहकामध्ये भाषेवरून जोरदार शाब्दिक चकमक

  बेंगळुरू : महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यास सक्तीचे केल्याने त्याचे देशभर पडसाद उमटतात. मराठी लोक भाषेसाठी दादागिरी करत असल्याची आवई उठवली जाते. पण आता कर्नाटकातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला थेट बँकच्या महिला मॅनेजरलाच कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. मॅडम, हे कर्नाटक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याशी कन्नडमध्येच संवाद …

Read More »

छत्तीसगडमध्ये २७ माओवाद्यांचा खात्मा!

  नारायणपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर जिल्ह्यामध्ये माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २७ माओवाद्यांना ठार मारले. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

कॉंग्रेस सरकारने राबविल्या गरीबांना मदत करणाऱ्या योजना : राहुल गांधी

  श्रीमंतानाच श्रीमंत करणाऱ्या भाजपच्या योजना, काँग्रेसचा साधना मेळावा बंगळूर : भाजप निवडक श्रीमंत लोकांना संपूर्ण पैसे आणि संसाधने मिळतील, अशा मॉडेलचे अनुसरण करत आहे, तर काँग्रेसच्या मॉडेलमध्ये पैसे बँक खात्यात आणि गरिबांच्या खिशात टाकले जात आहेत, असा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजपवर हल्लाबोल केला. राज्यातील काँग्रेस …

Read More »

… तर ‘त्या’ २६ पर्यटकांचे जीव वाचले असते : मल्लिकार्जून खर्गे

  ‘गुप्तचर’च्या माहितीवरून मोदीनी रद्द केला होता काश्मीर दौरा बंगळूर : गुप्तचर माहितीच्या आधारे काश्मीर दौरा रद्द केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना याबद्दल सावध केले असते तर २६ पर्यटकांचे प्राण वाचवता आले असते, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी म्हटले आहे. २२ एप्रिल रोजी …

Read More »