Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

एमआयएमने कोल्हापूरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक

  सकल हिंदू समाजाचा इशारा कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे सांगितलं आहे. मात्र, आता एमआयएमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील, जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू, या घटनेविरोधात एमआयएमने …

Read More »

जीवाची पर्वा न करता स्वतः उतरून स्वच्छ केला नाला!

  बेळगाव : नानावाडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील मुख्य रस्त्याशेजारील नाल्यात सुशिक्षित आणि अशिक्षित अनाडी, मूर्ख आणि बेजबाबदा लोकांनी कचरा बांधून टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा व प्रशासनाचा बेशिस्त निष्काळजीपणा यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याची दखल आमचे जागरूक कार्यकर्ते …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात रंगला रिंगण सोहळा

  विद्यार्थ्यांनी केल्या विविध वेशभूषा : शहरातून पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते. शिवाय माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून …

Read More »

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली जिल्ह्यातील विविध नदीपात्रांची पाहणी

आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना बेळगाव : शेजारील महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील विविध भागांची पाहणी केली. सूतगट्टीजवळील घटप्रभा नदीच्या पुलाजवळ नदीच्या प्रवाहाचा वेग आणि सध्याची पाण्याची पातळी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. यानंतर त्यांनी संकेश्वर …

Read More »

मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे : रणजीत पाटील

  खानापूर : मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठी भाषिकानी मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बुधवारी खानापूर तालुक्यातील गर्बेनट्टी, खैरवाड, बेकवाड, …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालयाने केले दिंडीचे आयोजन

  नेसरी : आज देशभर आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. 800 वर्षापासून दिंडीची परंपरा चालत आलेली असून आषाढी एकादशी म्हणूजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीच. पंढरपूर येथे आज विठ्ठल दर्शनासाठी गर्दीचा महासागर लोटला असून गावोगावी पण मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाते, त्या निमित्ताने नेसरी येथील श्री व्ही. के. …

Read More »

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार मल्लिकार्जुन यांनी स्वीकारला

  बेळगाव : मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दि. १६ रोजी जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता. तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 येथे दिंडीचे आयोजन

  बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 होसुर, बेळगाव येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख, अध्यात्माची गोडी, संतांची शिकवण आणि भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी या दिंडीचे आयोजन …

Read More »

कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षण; सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला मंजुरी

  बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि गट ड पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत एका …

Read More »

ओमानच्या किनार्‍यावर तेलवाहू जहाज बुडाले; १३ भारतीयांसह १६ कर्मचारी बेपत्ता

  ओमानच्या समुद्रकिनार्‍यालगत एक तेलवाहू जहाज बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन नागरिक असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी (१६ जुलै) याबाबतची बातमी दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले …

Read More »