Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

“महाराष्ट्र राज्य” फलक येळ्ळूर : आज चौथ्या खटल्याचा निकाल

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अशांतता निर्माण झाली होती,  याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल आज ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद …

Read More »

सीमाभागात मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सोपी करावी

  रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची भेट बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सीमाभागात अधिक सोपी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्याकडे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सीमाभागातील रुग्णांना तातडीने आणि सुलभतेने मदत मिळावी यासाठी प्रणाली सुधारण्याबाबत विचारविनिमय …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक; तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय

  सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी यासाठी प्रयत्न करणार बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी. याचिका मुख्य पटलावर घेण्यात यावी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात आयोजित तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Read More »

मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलेल्या ऑटो चालकाची आत्महत्या

  बेळगाव : बुधवारी बेळगावातील किल्ला तलावात एका ऑटो चालकाने उडी मारून जीवन संपवले. मृत व्यक्तीची ओळख बेळगावच्या कंग्राळी येथील किरण मनगुतकर (५४) अशी झाली आहे.किरण मनगुतकर यांनी एक वर्षापूर्वी मुलीचे लग्न केले होते. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सवलती द्याव्यात; रमाकांत कोंडुसकर यांची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये खुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. उच्च शिक्षणात मिळणाऱ्या सवलतींप्रमाणेच प्राथमिक विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तज्ञ समितीच्या बैठकीदरम्यान …

Read More »

शांताई विद्या आधारची गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कास मदत

    बेळगाव : गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत करणाऱ्या शांताई विद्या आधार या गटाने आपले कर्तव्य पुन्हा एकदा पार पाडताना नवज्योत टेक्नॉलॉजीसच्या मदतीने शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर शाळेतील दोन गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अदा केले. ज्ञान मंदिर शाळेतील एका छोट्या कार्यक्रमात शांताई विद्या आधारचे सदस्य ॲलन विजय …

Read More »

आशादीपतर्फे आई-वडिलांचा आधार नसलेल्या मुलाला शिक्षणासाठी आधार

  येळ्ळूर : महावीर नगर उद्यामबाग येथे भाड्याच्या घरामध्ये आजी सोबत राहणाऱ्या व आई-वडील असून देखील गेल्या चार वर्षापासून आजीकडे सोडून गेलेल्या मुलाला आशादिप वेल्फेअर सोसायटीतर्फे 5000 व शैक्षणिक साहित्य बरोबरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. वास्तविक पाहता या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आजी ऑफिसमध्ये फरशी पुसण्याच्या कामापासून घरोघरी जाऊन भांडी …

Read More »

तज्ञ समितीच्या बैठकीत युवा समिती सीमाभागच्या शिष्टमंडळाने दिली सीमाभागात होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती…

    बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे …

Read More »

कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून टिळकवाडीत महिलेचा खून

  बेळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे.गीता रणजीत दावले गवळी (वय 55) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत गीता हीचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी आठच्या दरम्यान गीता यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणामुळे टिळकवाडी …

Read More »

सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत बैठक

  बेळगाव : सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी उद्या (ता. १०) मुंबई येथे तज्ज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाबाबत योग्य ती माहिती आणि सल्ला देण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक मुंबईतील मंत्रालयात दुपारी तीन वाजता होणार …

Read More »