खानापूर : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील गावांना रस्ता तयार करण्याचे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना केले.
खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना चांगले रस्ते नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थांना प्रवास करण्यास त्रास होत आहे. खानापूर-गोवा रस्त्यापासून चापगाव 5 किमी., पाली 4 किमी, जांबोटी-गोवा मुख्य रस्त्यापासून चोर्ला 1 किमी, माण 1 किमी, हुळन्द 9 किमी, चिगळे 5 किमी, मुडगे, कपोली, चापोली 3 किमी, चिगले, आमगाव 7 किम आणि हेम्मडगा चेक पोस्ट 7 किमी हे रस्ते करून द्यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी ग्रामस्थांसोबत जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले.
निवेदन स्वीकारून सीईओ दर्शन एच. व्ही. यांनी, लवकरात लवकर हे रस्ते तयार करून देण्याचे आश्वासन दिले.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …