Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

शहर म. ए. समितीची बैठक उद्या

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक युवक यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More »

नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा : निपाणी येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी

  निपाणी (कर्नाटक) – महाराष्ट्रातील मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान …

Read More »

आमदार रोहित पवार यांचा बेळगाव दौरा

बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकार सीमावाद तापवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होत असताना, महाराष्ट्राला एकत्र यावेच लागेल. सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्मितेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज बेळगाव बोलताना केले आहे. सीमावाद तापला असताना …

Read More »

रोहित पवारांची येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट

  बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, महाराष्ट्र कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र विधायक रोहित पवार यांनी दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून रोहित पवार यांनी अभिवादन केले आणि त्यानंतर येळ्ळूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. येळ्ळूर …

Read More »

एनएसएसमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी 

सुनील देसाई : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता  निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना विभागातून कार्य कार्यक्षम विद्यार्थी घडविण्याचे प्रक्रिया या विभागातून केली जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विभागाच्या माध्यमातून होतो. कलागुणांचा विकास होऊन विद्यार्थी समाज उपयोगी कार्य करण्यास उद्युक्त होतो, असे मत अर्जुनी येथील उपसरपंच सुनील देसाई यांनी व्यक्त …

Read More »

दिल्लीत कॉंग्रेस उमेदवारांच्या निवडीसाठी कसरत

  राज्यातील नेत्यांना बैठकीत एकसंध रहाण्याचा सल्ला बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीसाठी आज दिल्लीत राज्यातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरीप्रसाद, केपीसीसीचे कार्याध्यक्ष आणि बहुतांश नेते या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत हायकमांडने …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तार; महत्वाच्या समुदायातील चेहरे समाविष्ट करण्याची योजना

  निवडणुकीपूर्वी समुदयाला खूश करण्याचा भाजपाचा प्रयत्न बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील नाराज समुदयाला खुश करण्याचा राज्यातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) …

Read More »

कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; पाच वर्षांच्या मुलीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

  बेंगळुरू : तब्बल दोन वर्षाच्या प्रादुर्भावानंतर देशातील कोरोनाचा आलेख हळूहळू शून्याकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर आता कर्नाटकात झिका व्हायरसची लागण झाल्याच्या रुग्णाची नोंद करण्यात …

Read More »

खानापूर लायन्स क्लबच्यावतीने समर्थ स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत खानापूर लायन्स क्लबच्यावतीने इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजयी स्पधर्काना लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. हम्मणावर, डॉ. राधाकृष्णन हेरवाडकर, पदाधिकारी अजित पाटील आजी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव …

Read More »

सीमावादानंतर पहिल्यांदाच शिंदे-बोम्माई यांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत चालला आहे. सीमावाद खटला सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर आला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जतसह 40 गावांवर दावा केलाय. सीमावादावरून शिंदे सरकारला विरोधकांनी घेरले होते. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अहमदाबाद विमानतळावर भेट झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. …

Read More »