Saturday , October 19 2024
Breaking News

आरपीडी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

Spread the love


बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर शनिवारी चर्चासत्र आयोजित केले होते. शहरातील राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयातील (आरपीडी) केएम गिरी सभागृहात शनिवारी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2021 : समग्र शिक्षण पद्धतीत बदल’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामचंद्र गौडा, महाविद्यालयीन शिक्षण विभाग, धारवाडचे सहसंचालक वाय. एस. हनुमंतय्या, यूजीसीचे शिक्षणाधिकारी लता के. सी., सोलापूरच्या वालचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्रसिद्ध लेखिका रेखा देशपांडे, रवींद्र मडिहळ्ळी आणि केएसईचे अध्यक्ष किरण ठाकूर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांनी रोपांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना आरसीयूचे कुलगुरु रामचंद्र गौडा म्हणाले, नवे कालानुरूप शैक्षणिक धोरण देशात राबविण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. बहुभाषिकतेतून भाषेची क्षमता विकसित केली जाईल. परीक्षा प्रणालीत अनेक सुधारणा केल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. शिक्षकांत गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी नवीन धोरणात तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत खूप बदल व्हायला हवेत. त्यामुळे सरकार हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत आहे. 2035पर्यंत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घडवून आणावयाच्या अनेक बदलांचा यात समावेश आहे असे ते म्हणाले.
या चर्चासत्रात महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *