बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात होणार पाऊस हा बहुतांशी लोकांना त्रासदायक ठरतो. मात्र जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही. पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की, कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, तेथे 30 टीएमसीजीपेक्षा जास्त पाणी साठलेले नाही. कोयना जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे धरण पूर्ण भरेपर्यंत ते पाणी बाहेर पडू देत नाहीत. वारणा येथे ३४ टीएमसी क्षमतेचे दुसरे धरण आहे. तेथेही 25 टीएमसी पाणीसाठा झालेला नाही. दूधगंगा नदीवर 25 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. त्यात केवळ 11 टीएमसी पाणीसाठा संग्रहित झाला आहे. तर राजापूर बॅरेजपर्यंत आपल्याकडे 7 बॅरेजेस आणि बंधारे आहेत. आपल्या सीमाभागात जेवढे पाणी येते ते पाणी 59 टीएमसी इतकेही नाही. त्यामुळे सध्या तरी पुराची भीती नाही. वाढत्या पावसामुळे स्थानिक लोकांचे हाल होत आहेत. लोकांचे त्रास टाळण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिल्या आहेत. आमचे अधिकारी संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेने काम करत आहेत.
पुढे बोलताना कारजोळ म्हणाले की, 8 तारखेला पूर नियंत्रणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत राज्यातील पूरस्थितीची माहिती घेण्यात आली व त्याबाबतच्या सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. राज्यात अतिवृष्टी आणि पावसाअभावी कोणतीही समस्या नाही. सरकारने याबाबत योग्य ती उपाययोजना केली आहे. पूर नियंत्रणाबाबत वेळोवेळी बैठका होऊन योग्य ते निर्णय घेण्यात आले आहेत. यासंदर्भात बेळगाव आणि बागलकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी 386 केंद्र, 266 पशु बचाव केंद्र आणि 36 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्याकडे एनडीआरएफच्या २२ टीम आणि सुमारे 200 स्वयंसेवक आहेत. बेळगावातील सुमारे 61 गावे पूर्णपणे पाण्याखाली तर 166 गावे अंशत: पूरग्रस्त होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पीडी खात्यात २८ कोटी रुपये आहेत. अशा प्रकारे वेळोवेळी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. पूर नियंत्रणाच्या सर्व उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. बागलकोटमध्येही आमच्या अधिकाऱ्यांनी याआधी बैठका घेऊन कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. बाधितांना तातडीने मदत वाटप करण्याची सूचना दिली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जलाशयांच्या पाणी साठवण क्षमतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, आमच्या जलाशयांमध्येही पाणी पूर्णपणे साठलेले नाही. सर्व जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे पूरस्थिती नाही. लोकांना कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यांनी आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या समस्यांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta