मुंबई : कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांबरोबरच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हालचालींवर आपली बारीक नजर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आपल्या संपर्कात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याचा मला विश्वास आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात समितीचा एकच उमेदवार जाहीर केल्यास, विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी इंजिनिअरिंग सेलचे निमंत्रक अमित देसाई यांनी आज मंगळवारी मुंबई येथील सिल्वर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आम्ही देसाई यांनी, बेळगाव सीमाभागातील बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार मतदारसंघातील निवडणुकात संदर्भात अहवाल सादर केला. या अहवालात मागील तीन निवडणुकांची सविस्तर माहिती, प्रत्येक वेळच्या निवडणुकीत झालेले मतदान, सध्याचे मतदान,यावेळी समितीच्या वतीने इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती देण्यात आली.
सदर अहवाल पाहिल्यानंतर शरद पवार यांनी म. ए. समिती वतीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. एकजुटीतून समिती उमेदवारांचा विजय निश्चित आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास आहे. प्रसंगी आपण मार्गदर्शनासही तयार असल्याचे पवार यांनी बोलून दाखवले असल्याचे अमित देसाई यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta