Wednesday , December 10 2025
Breaking News

‘ब्रह्माकुमारी’च्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावजवळील हलगा गावात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला.

शेतकऱ्यांची सविस्तर माहिती देताना राजयोगिनी बी.के. शांता म्हणाल्या की, सामान्य शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आजकाल आमची सर्व मुलं जी शेतकरी वर्गातली आहेत ती पुढील शिक्षणानंतर डॉक्टर, इंजिनियर, वकील, सरकारी नोकर बनली तर भविष्यात काळात सर्वांना अन्न मिळणे कठीण होईल. खेड्यातून दूध शहरात जाते. पण शहरातून दारू गावात येत असल्याने शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत होत आहे. प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी रसायनमुक्त पिके घेतली पाहिजेत. चांगले अन्न खाऊन निरोगी राहणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे कृषी विभाग, बेळगावचे सहसंचालक शिवनगौडा पाटील म्हणाले की, शेतकरी जेव्हा कर्मयोगी म्हणून शेतीमध्ये गुंततात तेव्हा ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होतात. शेतकऱ्यांनी रसायनांचा वापर न करता सेंद्रिय शेती करावी. जे पूर्णपणे निरोगी आहेत तेच खरे श्रीमंत आहेत, असे ते म्हणाले. पाहुणे म्हणून आलेले अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन वाली म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये संयम हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी खूप कष्ट केले पण योग्य पीक आले नाही. पीक आल्यावर योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी शेती करण्यास नाखूष आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. राजयोगी बी. के. महांतेश यांनी योगाच्या माध्यमातून शेतीविषयी माहिती दिली आणि पपई आणि बागायती पिके स्वत:च्या जमिनीवर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता, शेणखताचा वापर करण्याचा अनुभव सांगितला.
राजेश्वरी रेणुकेगौडर म्हणाल्या की, समाजात शेतकऱ्यांची कमतरता आहे. शेतकर्‍याचा मुलगा म्हणजे मुलगी द्यायला मागे-पुढे पाहणे. असे होता कामा नये, असे सांगून शेतकऱ्यांना समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
राजयोगिनी बी. के. मीनाक्षी यांनी ईश्वरीय संदेश सांगितला. राष्ट्रीय शेतकरी दिनाचा एक भाग म्हणून हलगाचे तवनप्पा पायण्णावर, अलरवाडचे भीमप्पा पुनाजीगौडा, मास्तमर्डी येथील मारुती चौगला, तारिहाळ येथील यल्लाप्पा निलजकर या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
बी. के. सुनीता यांनी स्वागत, बी. के. श्रीकांत यांनी सूत्रसंचालन केले. बी.के. यल्लाप्पा परांडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *