Friday , October 18 2024
Breaking News

देश/विदेश

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी; अनेक जण बेपत्ता

  शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील समेज खाडमध्ये ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना झाली आहे. ढगफुटीमुळे अनेक जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम, पोलीस तसेच बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. पुरामुळे अनेक रस्ते बंद झाल्याने बचाव यंत्रणांना सर्व उपकरणांसह दोन किमीवर चालत जावे …

Read More »

देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

  मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू …

Read More »

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार, मृतांचा आकडा १४३ वर

  वायनाड : केरळच्या वाडनाड येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने ४ गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजूनही २०० पेक्षा अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरूच …

Read More »

वायनाडमध्ये भूस्खलन; १९ जणांचा मृत्यू

  वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत २ लहान मुलांसहित १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे ४.१० वाजता …

Read More »

तब्बल 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसल्याचा दावा!

  नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे. अमझद …

Read More »

भूखंडाच्या वादातून पाकिस्तानात दोन गटात हिंसाचार; ३६ ठार

  कराची : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झालाय. तर १६२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंसाचार प्रभावित भागात पोलीस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात …

Read More »

दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी; दोन मुलींसह तिघांचा मृत्यू

  नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याकारणाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत जुने राजेंद्र नगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचले. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते. दिल्ली …

Read More »

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार

  नवी दिल्ली : महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील …

Read More »

नेपाळच्या काठमांडूमध्ये मोठा विमान अपघात; १८ जणांचा मृत्यू; केवळ पायलट बचावला

  काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला आग लागून भीषण अपघात झाला. उंचावरून हे विमान थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्ती केली जात आहे. सध्या मदतकार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. …

Read More »

सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर; ३ कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचे घर मिळणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. ही योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला …

Read More »