Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या १२ म्हशींची हरसनवाडीजवळ सुटका

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्या मार्गे गोव्याकडे कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका करणे, जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवून पोलिसाच्या ताब्यात देणे हे खानापूर हिंदुत्ववादी संघटना नेहमीच करतात. अशीच घटना सोमवारी खानापूरातुन चोर्ला मार्गे गोव्याला कंटेनरमधून १२ म्हशी कत्तलखान्याला घेऊन जाताना खानापूर जांबोटी मार्गावरील हरसनवाडी जवळ पकडून त्यांची सुटका …

Read More »

कामचुकार सफाई कामगारांना महापालिका आयुक्तांचा दणका!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सोमवारी सकाळी शहराचा फेरफटका मारत पाहणी केली व कामचुकार सफाई कामगारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आयुक्तांच्या नजरेत आल्यामुळे त्यांनी सफाई कामगार व कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले आहे. वारंवार होत असलेल्या कचरा उचल संदर्भातल्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सोमवारी पहाटे …

Read More »

लोंढा येथे आर्थिक व्यवहारातून दोघांवर ब्लेडने हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावात क्रिकेट सट्ट्याच्या पैशाच्या कारणावरून दोघांवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी करण्यात आले असून या हल्ल्यात लोंढा गावातील रहिवासी अल्ताफ नाईक व इरफान मेहबूब देशपायीक हे गंभीर जखमी झाले असून बेळगाव येथील आसिफ जमादार आणि उमर शेख या दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. …

Read More »

कृषीमंत्र्यांवर लाच घेतल्याचा आरोप; सहायक कृषी अधिकाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार

  बेंगळुरू : कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करत ७ सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांनी 6 ते 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून लाचखोरीला आळा घातला नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करू, असे या अधिकाऱ्यांनी …

Read More »

गणेशोत्सव संदर्भात पालकमंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : गणेश महामंडळांच्या कोणकोणत्या मागण्या प्रशासनाकडे आहेत यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गणेश महामंडळ तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखालीच सदर बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस, …

Read More »

भारताची पुन्हा हाराकिरी! दुसऱ्या टी 20 सामन्यात विडिंजचा दोन विकेटने विजय

  अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजने भारताचा दोन विकेटने पराभव केला. भारातने दिलेले 153 धावांचे आव्हान विडिंजने दोन आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विडिंजकडून निकोलस पूरन याने 67 धावांची दमदार खेळी केली. या विजयासह विडिंजने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कताना विडिंजच्या फलंदाजांनी …

Read More »

बेळगावच्या खेळाडूंनी मारली बाजी

  बेळगाव : बेंगळुरू येथील सी एम ए ग्रँड हॉल येथे आज दि. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या जपान शोटोकॉन इंडिपेंडेंस कप ओपन चॅम्पियन स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. या ओपन चॅम्पियन स्पर्धेत 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता. बेळगाव येथील सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

उत्तराखंडातील गाैरीकुंडमध्‍ये दरड कोसळून ३ ठार; २० बेपत्ता

  उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्‍ये तिघांचा मृत्यू झाला असून, २० जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामयात्रेच्या मार्गावर हा अपघात झाला. बचाव पथकामार्फत शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी १७ नेपाळचे नागरिक आहेत. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल …

Read More »

तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन

  दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर यांचं रविवारी (6 ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. क्रांतिकारी गीतांसाठी नावाजलेले ‘गदर ‘ यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असं होतं. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, २४ तासांत ६ हत्या

  इन्फाळ : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागात पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला …

Read More »