Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव आयुक्तालयात 10172 कोटी रुपये जीएसटी संकलन

बेळगाव : केंद्रीय जीएसटी बेळगाव आयुक्तालयाने 2021-22 या आर्थिक वर्षात 10172 कोटी रुपये इतके विक्रमी जीएसटी संकलन केले आहे अशी माहिती बेळगावचे जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी दिली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी म्हटले आहे की, इतके विक्रमी जीएसटी कर संकलन हे …

Read More »

कोगनोळी येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न

कोगनोळी : येथील भगवा चौक येथे असणार्‍या पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले, समस्त हिंदू धर्मीयांच्या वतीने 3 मार्च ते 1 एप्रिल (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर छत्रपती …

Read More »

टोल दरवाढीचा वाहनधारकांना भुर्दंड

कोगनोळी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने शुक्रवार तारीख १ च्या मध्यरात्रीपासून टोल दर वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली असून टोल दरवाढीचा वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाक्यावर येणाऱ्या …

Read More »

सिंगीनकोप शाळेत विद्यार्थ्यांना निरोप

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इदलहोंड केंद्राचे सीआरपी गोविंद पाटील, सिंगीनकोप ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, तसेच …

Read More »

संकेश्वर “एआयएमआर” विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी..

संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन महोत्सवात संकेश्वर अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिके जिंकून घवघवीत यश संपादन केले. मिस. किरण पाटील हिने प्रकल्प प्रस्ताव लेखनात प्रथम पारितोषिक पटकाविले. मिस. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली पूजा माळी, शिवानी राठोड आणि कावेरी सुतार यांनी बिझनेस …

Read More »

संकेश्वरात “वॉकर्स वे”ची संजय नष्टी यांना श्रद्धांजली

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडी नगरसेवक लढवय्या नेते संजय दुंडापण्णा नष्टी यांच्या अकालीक निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन संकेश्वर वॉकर्स वे सदस्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना वॉकर्स वे फ्रेंडसचे किरण किंवडा म्हणाले संजय नष्टी हे संकेश्वरच्या सर्व २३ प्रभागाच्या विकासासाठी झटणारे धडाडीचे नगरसेवक होते. त्यांना सर्व प्रभागांची काळजी असायची संकेश्वर …

Read More »

बायपास रस्त्यावरील कचऱ्याची शेतकरी रविवारी विल्हेवाट करणार!

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकरी एकत्र येऊन येत्या रविवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी श्रमदानाने या रस्त्याशेजारील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या व इतर कचरा गोळा करणार आहेत. …

Read More »

बेळगावात १३० कोटीतून होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव : बेळगावात ४ एकर प्रशस्त जागेत १३० कोटी रुपये खर्चातून किडवाई कॅन्सर संस्था हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बंगळूरच्या किडवाई संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी सांगितले. बेळगावात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सी. रामचंद्र म्हणाले, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर येथे किडवाई संस्थेची केंद्रे सुरु करण्यात आली …

Read More »

अमित शहा यांनी दिली सुशासन यात्रेला चालना

बेंगळुरू : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने बेंगळूर येथे आयोजित केलेल्या सुशासन यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी चालना दिली. भाजप युवा मोर्चाच्या राज्य शाखेने बंगळुरात सुशासन यात्रा आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी त्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री …

Read More »

शेतकर्‍याच्या न्याय हक्कासाठी रयत संघटना सदैव तत्पर

राजू पोवार : दत्तवाडी येथे शाखा उद्घाटन कोगनोळी : आज बाजारपेठेमध्ये सर्व वस्तूचे दर निश्चित आहेत. पण शेतकर्‍याच्या शेतातून निघणार्‍या शेतीमालाचा दर निश्चित नाहीत. शेतकर्‍याची सर्व स्तरातून अडवणूक होत आहे. शेतकरी जर सुजलाम सुफलाम व्हायचा असेल तर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. एकत्र येऊन काम केल्याशिवाय शेती मालाला …

Read More »