Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

हेरवाडकर शाळेत नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू : डॉ. कुलकर्णी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल या आमच्या शाळेने कॉज टू कनेक्ट फाउंडेशन नावाच्या ना-नफा संस्थेशी एकीकरण करून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे. शाळेच्या ‘वी मेक वर्दी सिटीझन्स’ या ब्रीदवाक्याला पूर्णतः पूरक असा हा …

Read More »

सन्मित्रचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

  येळ्ळूर : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात सोसायटी च्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. विद्या रा. पाटील होत्या. सौ. वीणा स. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ. लक्ष्मी मा. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालिका सौ. …

Read More »

श्री समादेवी पालखी उत्सव उत्साहात साजरा

  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील सोमवारी सकाळी महाअभिषेकानंतर सायंकाळी पालखी उत्सव पार पडला. यावेळी वैश्य समाजातील बांधव आणि भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने भाग घेतला होता. सोमवारी …

Read More »

पंढरपूर येथील वैष्णव आश्रमाच्या बांधकामासाठी नेताजी सोसायटीकडून देणगी

  पंढरपूर येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम : भक्तासह मान्यवरांची उपस्थिती येळ्ळूर : येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या भाविकासाठी पंढरपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वैष्णव आश्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पंढरपूर येथे पार पडला. येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे आणि सर्व संचालक …

Read More »

विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान

  बेळगांव : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना दिनांक नऊ फेब्रुवारी 2025 रोजी विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन …

Read More »

खाऊ कट्टा प्रकरणाने दोन नगरसेवकांचे पदचं खाल्ले!

  बेळगाव : बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा भ्रष्टाचार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांना दोषी मानून दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्तांनी बजावला आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लवकरच होत असताना, आज करण्यात आलेली दोन नगरसेवकांच्या विरोधातील कारवाई बेळगावच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात …

Read More »

आमदार बसवराज यत्नाळ-पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

  नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने आमदार, माजी केंद्रीय मंत्री बसनागौडा पाटील यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ७२ तासांच्या आत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये सुरू असलेल्या कारवायांनी मोठे वळण घेतले आहे. यत्नाळ यांना सोमवारी नोटीस बजावून भाजपने धाडसी पाऊल …

Read More »

खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड अखेर निलंबित

  खानापूर : खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरांसह, निपाणी, अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची …

Read More »

करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जा : ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा

  बेळगाव : जगात करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. मात्र आम्ही मोजक्याच क्षेत्रात गुरफटलो आहोत. करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जावे. ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे कॉलेजमधूनच मिळायला हवेत असे मत ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी व्यक्त केले. विश्वभारत सेवा समितीच्या पंडीत नेहरु पीयु कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने ते …

Read More »

विधिज्ज्ञ हरिष साळवे मांडणार सीमाप्रश्नी बाजू; महाराष्ट्र सरकारकडून पाठपुरावा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आंदोलन करताच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सीमाप्रश्नाच्या दाव्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे सीमावासीयांची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दाव्याला बळकटी आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून खटला प्रलंबित आहे. या दाव्यात विधिज्ज्ञ …

Read More »