Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर तालुक्यात वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा अभाव: डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : केएलई हॉस्पिटलला नुकत्याच दिलेल्या भेटीने खानापूर तालुक्यातील सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांची नितांत गरज अधोरेखित केली. मंगळवारी डॉ. सरनोबत यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये जाऊन खानापूर तालुक्यातील हर्षदा घाडी या महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. या रुग्णाला आमगाव (ता. खानापूर) येथून अत्यंत गंभीर अवस्थेत बांबूच्या सहाय्याने तिरडीप्रमाणे …

Read More »

सागर बी.एड्. महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफल उत्साहात

  बेळगाव : सागर शिक्षण (बी.एड्.) महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी विविध सुमधूर प्रार्थना गीते, भजने, भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, सिनेगीते, देशभक्तीगीते उत्कृष्टपणे प्रस्तुत करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. कार्यक्रमाची सुरूवात प्रशिक्षणार्थींच्या सुमधूर प्रार्थनेने झाली. प्रा. एस. पी. नंदगाव यांनी …

Read More »

आमगावच्या महिलेला डॉ. अंजलीताई फाउंडेशनची मदत

  खानापूर : मागील दोन दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील आमगाव गावात हर्षदा घाडी नावाच्या महिलेला छातीत दुखत असल्याने सदर महिलेला मुसळधार पावसात गावकऱ्यांच्या सहकार्याने खांद्यावर उचलून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. खानापूरमधील असुविधांमुळे सातत्याने असे प्रकार पुढे येत असून घडल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. जन्म-मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेला गावकरांनी …

Read More »

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली. हणमंत रामचंद्र खोत (३४) आणि खंडोबा तानाजी खोत (३२) यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता, गावातील …

Read More »

सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर; ३ कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचे घर मिळणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. ही योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला …

Read More »

विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचे शैक्षणिक कर्ज

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (मंगळवारी) संसदेत मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने, 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत. तसेच मध्यमवर्गीयांसाठी …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती. आज (दि. २३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण …

Read More »

अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळ निश्चित!

  बेळगाव : सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी-पिरनवाडी रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग 54) अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांबोटी (राज्य महामार्ग 31) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी …

Read More »

दुचाकीवरून पडल्याने आशा कार्यकर्ती ठार

  लोंढा : लोंढा येथून रामनगरकडे जात असताना दुचाकीवरून पडल्याने लक्ष्मी झरंबेकर (वय 45) रा. मुंडवाड तालुका खानापूर ही आशा कार्यकर्ती ठार झाली. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रामनगरजवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या. तेथून परत आपल्या गावाकडे जाताना एका दुचाकीस्वाराने …

Read More »

कृष्णा नदीला पूर; कुडची पुल पाण्याखाली!

  चिक्कोडी : चिक्कोडी आणि महाराष्ट्रातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीवरील कुडची पुलाला पूर आला आहे. जमखंडी व उगार यांना जोडणारा कुडची पूल पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. कुडची पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आधीच रस्ता बंद करून कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून दूधगंगा नदीच्या …

Read More »