Tuesday , March 18 2025
Breaking News

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली. हणमंत रामचंद्र खोत (३४) आणि खंडोबा तानाजी खोत (३२) यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी आहेत.
दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता, गावातील वडिलधाऱ्यांनी दोघांमध्ये तडजोड करूनही काल रात्री दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन दोघांनी एकमेकांवर शस्त्रे घेऊन मारामारी केली. दोघेही जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराअभावी रात्री उशिरा दोघांचाही मृत्यू झाला. अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

About Belgaum Varta

Check Also

“महाराष्ट्र गीत” लावल्याचा ठपका; महाराष्ट्र सरकारकडून दखल घेतली जाईल

Spread the love  सीमाभाग समन्वयक श्री. शंभुराजे देसाई यांचे आश्वासन बेळगाव : चव्हाट गल्लीतील रंगपंचमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *