Thursday , September 19 2024
Breaking News

धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदी

Spread the love
खानापूर : जांबोटी, कणकुंबी भागातील चिखले, पारवाड, माण व चिगुळे परिसरातील धबधब्यांचा व वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी खानापूर बेळगाव परिसरांमधून शेकडो तरुण-तरुणी येतात. कणकुंबी परिसरातील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करून दंगामस्ती करणे व आरडाओरडा करणे अशा प्रकारामुळे या भागातील नागरिकांना गेल्या काही वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वनखाते आणि पोलीस प्रशासन जागे झाले आहे. नुकतेच माण येथील शिंबोळा धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याने प्रशासन जागे झाले आहे. त्यामुळे काल रविवारी पोलीस प्रशासनाने प्रवेशबंदी करून पर्यटकांना वापस पाठवल्याने चांगलीच गोची झाली.
काल रविवारी हजारो पर्यटक जांबोटी कणकुंबी भागातील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी येत होते. परंतु हब्बनहट्टी क्रॉस येथे जांबोटी पोलिसांनी पर्यटकांच्या गाड्या अडवून त्यांना वापस पाठविले. त्यामुळे पेट्रोल पंपाजवळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अनेक पर्यटक नाराज होऊन वापस गेले तर काही पर्यटकांनी छुप्या मार्गाने चिखले कणकुंबी येथील धबधब्यांचा आनंद लुटून आपले इप्सित साध्य केले.
वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वन खात्याने काही नियम घालून परवानगी देणे हिताचे ठरू शकते, पर दंगामस्ती करणाऱ्या पर्यटकांमुळे कणकुंबी वनखात्याने निर्बंध घातले आहेत. जांबोटी पोलिसांनी रविवारी वर्षा पर्यटनाचा आन लुटण्यासाठी येणाऱ्या युवकांना हब्बनहट्टी क्रॉसजवळील पेट्रोल पंपाजवळ सर्व गाड्या अडवून वापस पाठवलेला निर्णय योग्य असला तरी यावर तोडग्याची गरज आहे. धबधब्याच्या ठिकाणी नको ते प्रकार करत असतात. त्यामुळे विपरित घटना घडण्याची शक्यता असते. तसेच या जंगल भागात अनेक हिंस्र जंगली प्राण्यांचा वावर असल्याने पर्यटकांना त्यांच्यापासून धो पोहोचू शकतो. त्याची खबरदारी घेऊन वनखाते व पोलीस प्रशासनाने पर्यटकांना बंदी घालून वापस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अति उत्साही पर्यटक केवळ धबधब्यांचा किंवा वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत नाहीत प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बॉटल्स इत्यादी जंगलामध्ये फेकून पार्टी व मौजमज करण्यासाठीच येत असतात. मात्र त्याचा काही चांगल्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तेव्हा पोलीस प्रशासन व वनखात्या योग्य ती उपाययोजना करून पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्याची संधी द्यावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *