Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीवरील पुलाची आमदारांनी घेतली दखल, मंत्र्याशी केली चर्चा

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर शहरालगत असलेल्या मलप्रभा नदीवरील पूल धोकादायक बनले आहे. या मलप्रभा नदीवर नव्याने पुल उभारणीसाठी भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी नुकताच दिल्ली येथे केंद्रीय अवजड रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
यावेळी खानापूर तालुक्यातील रस्त्या संदर्भात तसेच महामार्गावरील समस्येबाबत तसेच मलप्रभा नदीवरील नविन पुल आदी विषयांवर चर्चा करताना म्हणाले की, मलप्रभा नदीवरील पूल हा फार वर्षापूर्वीचा आहे. सध्या या पुलावरील कठडा पूर्णपणे धोक्याचा बनला आहे. या पुलावर बांबू बांधुन सरंक्षण दिले आहे. सध्या स्थितीत मलप्रभा नदीवरील पूलाचे फोटो आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी मंत्री नितीन गडकरीना दाखवले. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेत लागलीच पुलाच्या कामासाठी तयारी दर्शविली. हा धोकादायक पुल आहे. नविन पूल झाला पाहिजे यासाठी जातीने लक्ष घालतो, असे आश्वासन दिले.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तसेच अभिजीत चांदिलकर आदी उपस्थित होते.
तेव्हा खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीवरील पूलाच्या कामाला चालना मिळणार असल्याची माहिती पत्रकारांना बोलताना दिली.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *