Tuesday , March 3 2026
Breaking News

बकरी ईद दिवशी गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करा

Spread the love

बजरंग दलची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांची अस्मिता असलेल्या गो मातेची हत्या इतर धर्मियांकडून बकरी ईदच्या निमित्ताने केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी व असे प्रकार थांबवण्यासाठी तसेच गोमातेचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष श्री. गोविंदराव किरमीटे, तालुका बजरंग दल प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, शहर प्रमुख अमोल पूर्वी, निलेश आलवणे, जानबा शिंदे, गौरव पाटील, अनिकेत गावडे, माऊली पाटील, राम आलावणे, रावजी मोटर, सुनील अथणीकर, किरण अष्टेकर, विश्वनाथ पाटील, मंजुनाथ दंगल, विनायक कट्टी, अजय अष्टेकर व इतर बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *