खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात या भागात या-ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यातच अतिपावसाचा परिसर असल्याने सतत पाऊस पडत असतो. अशावेळी आग पेटून शेकोटीशिवाय जगताच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रॉकेलची नितांत गरज आहे. रॉकेलवीना पावसाळ्यात दिवस काढताना अनेक त्रास सहन करावे लागतात.
रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडीत होऊन अंधाराचे साम्राज्य पसरते. अंधारातून हिस्त्र प्राणी गावात शिरतात. अशावेळी नागरिकांच्या जीवाला धोका संभवतो. निधान रॉकेलची सोय झाली तर रॉकेलच्या उजेडात राहाता येईल.
यासाठी सरकारने तसेच लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलाने व्यापलेल्या भागातील रेशन दुकानातून रॉकेलची व्यवस्था करावी, अशी मागणी चिगुळे गावचे माजी सैनिक गणपत गावडे यांनी केली आहे.
Check Also
खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
Spread the love बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …