Thursday , February 19 2026
Breaking News

पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूरातून गुरव गल्ली व घाडी गल्लीतून पाठिंबा

Spread the love

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य असून मराठी प्रेमी जनतेने तो यशस्वी करावा, असे आवाहन पत्रक लिहून आम्ही यशस्वी करू. यावेळी लक्ष्मण गुरव, कृष्णा देसाई, मारूती गुरव, विलास गुरव, विनोद गुरव, हणमंत गुरव, सुभाष गुरव, मऱ्यानी गुरव, विनायक घाडी, विनोद गुरव, विष्णू गुरव, रामू बाळकृष्ण गुरव, अनिल गुरव व आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर

Spread the love  खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *