पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. कार आणि लग्झरी बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणार्या या मार्गावर हा अपघात झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहुन मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारची लग्झरी बसला धडक बसली. गुजरातहुन मुंबईकडे जाणार्या भरधाव कारवरील चालकाच नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं येणार्या लक्झरी बसवर कार धडकली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर बसमधील तीन प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झाले.
कासा पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे हा अपघात झाला. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं गुजरात लेनवर जाऊन गुजरातच्या दिशेने जाणार्या लग्झरी बसनं समोरासमोर ठोकर मारल्यानं हा अपघात झाला. सदर अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी (वय 36 वर्ष), इब्राहिम दाऊद (वय 60 वर्ष) आसिया बेन कलेक्टर (वय 57 वर्ष) इस्माईल महंमद देसाय (वय 42 वर्ष) अशी अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. तर लग्झरीमधील तीन प्रवाशांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघात कासा पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta