Wednesday , December 10 2025
Breaking News

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

Spread the love

 

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. शिवाय हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन भटकणारे नातेवाईकही येथे पाहायला मिळाले.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश होता. त्यामुळे नांदेडात एकच खळबळ उडाली आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे न मिळाल्याने जीव गमवावा लागण्याची वेळ येत असल्याची भीती व्यक्त होत आहे. घाटी रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत मिळणारा निधी अपुरा पडतो. औषध पुरवठाही अपुरा पडतो. त्यामुळेच घाटीत कायम औषधटंचाई पाहायला मिळते. त्यामुळे घाटी परिसरात औषध दुकानांची संख्या वाढतच आहे.

बहुतेक रुग्ण बाहेरून रेफर झालेले
औषधी तुटडा किंवा डॉक्टरच्या कमतरतेने, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झालेले नाहीत. यातील बहुतेक रुग्ण हे बाहेरून रेफर केलेले होते किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती डीन संजय राठोड यांनी दिली.

घाटीला किती प्रकारची लागतात औषधे?
घाटी रुग्णालयाला तब्बल १२० प्रकारची औषधे लागतात. यातील अनेक औषधांचा आजघडीला ठणठणाट आहे. त्यामुळे अशा औषधांची नातेवाईकांच्या हातात चिठ्ठी देऊन बाहेरून आणण्यास सांगितले जाते. योजनेच्या माध्यमातून औषधे उपलब्ध करून दिली जातात, तसेच गरजूंसाठी लोकल पर्चेसही केले जाते, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *