खानापूर : खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि. ३१ रोजी खानापूर कोर्टातील वकील संघटनेच्या कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते. व्यासपीठावर ऍड. एच. एन देसाई, ऍड. केशव कळेकर, ऍड. सुरेश भोसले, ऍड. अनंत देसाई, ऍड. चेतन मणेरीकर, ऍड. अरूण सरदेसाई, आदी वकील उपस्थित होते.
यावेळी ऍड. चेतन मणेरीकर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
तर सत्कार मुर्ती नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार म्हणाले की, तालुक्याच्या समस्या भरपूर आहेत. वकील संघटनेच्या वतीने नुकताच खानापूर बेळगाव शटल बस सुरू व्हावी यासाठी रास्तारोको करून समस्यांची जाणीव करून दिली. यासाठी बस सेवेसाठी प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अशा अनेक समस्या तालुक्यातील जनतेच्या आहेत.त्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
यावेळी ऍड. लोटुपकर, ऍड. श्रीमती हिरेमठ व इतर वकीलांनी विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय आर. घाडी म्हणाले की, भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी ९२ हजार मताचा विक्रम करून खानापूर तालुक्यात इतिहास घडविला. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, तसेच राजकीय क्षेत्रात चांगले कार्य केले. त्याचे फळ म्हणून आमदार की मिळाली. तेव्हा येत्या पाच वर्षात खानापूर तालुक्याचे नंदनवन करावे, अशी मागणी केली.
कार्यक्रमाला वकीलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. चेतन मणेरीकर यांनी केले.