
येळ्ळूर : येत्या रविवार दि. 15 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या “मराठी सन्मान यात्रे”ला अवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात आला. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या जागृती बैठकीत माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. धाकलू करविनकोप यांनी पाठिंबा जाहीर करून प्रचंड संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल
पुन्हा एकदा या लढ्याला नवी उभारी देण्यासाठी युवकांनी हा लढा आपल्या हातात घेतला आहे मराठी साठी आपण सर्वजन मराठी सन्मान यात्रेत सहभागी होऊन येळ्ळूर महाराष्ट्र चौकात होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी मराठी सन्मान यात्रे संबंधित सविस्तर माहिती विशद करून या मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी दता उघाडे सीमा लढ्यावर सध्या चालू घडामोडींवर भाष्य करत मराठी संस्कृतीसाठी आपण संघटित होऊन येणाऱ्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आपली संघटना मजबूत करुया असे सांगून येळ्ळूर येथे १५ मार्च रोजी आयोजित केलेली सभा आणि मोटरसायकल रॅली यशस्वी करण्याचे आवाहन केले.
माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेलगे यांनी मराठी सन्मान यात्रेचे आवचारहट्टी गावात जंगी स्वागत करणार असल्याचे सांगितले. आनंद तुळजाई यांनी गावातील सर्व युवा मनापासून सहभागी होऊन ही सन्मान यात्रा यशस्वी करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य कल्लापा मेलगे, वामनराव पाटील, दुद्दापा बागेवाडी, राजू पावले आदींची भाषणे झाली. जेष्ठ कार्यकर्ते मारुती तुळजाई यांनी युवकांनी घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक करत आवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा जाहीर केला. आवचारहट्टी धरणात मरण पावलेल्या नाना सळेभावी यांच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले.
याप्रसंगी विठ्ठल कुरंगी, चांगाप्पा तुळजाई, आनंद तुळजाई, चांगाप्पा कुरंगी, चांगाप्पा तुळजाई, आनंद तुळजाई, विठ्ठल कुरंगी, सोमनाथ कुरंगी, सुरेश मेलगे, विलास यरमाळकर, विलास पाटील, सिद्धाप्पा कुरंगी, रामा मेलगे, कृष्णा मेलगे, विठ्ठल मेलगे, चांगदेव परीट, बी.एन. मजुकर, कृष्णा शहापूरकर, यलुपा पाटील, दयानंद उघाडे, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, सतीश देसुरकर, प्रकाश मालुचे, नेताजी गोरल, सुरज गोरल, राकेश परिट, श्रीकांत नांदूरकर इत्यादी समिती कार्यकर्ते हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta