Wednesday , December 10 2025
Breaking News

बेळगाव शहरात पंधरा टक्के पाणी कपात

Spread the love

 

बेळगाव : मान्सून लांबल्यामुळे बेळगाव शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जलाशयातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे शहर पाणीपुरवठ्यात 15% कपात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरातील कुपनलिका, विहीर व हातपंप यांचाच आधार बेळगावकरांना राहणार आहे.
कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ व एल अँड टी कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील 786 कुपमनलिका, ६८ विहिरी व 139 पंपांचा वापर पाणी टंचाई काळात होऊ शकतो. याशिवाय संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन कृती आराखडा हे तयार केला आहे. त्यानुसार हिडकल जलाशयातील पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली जाणार आहे. ते पंधरा टक्के पाणी लक्ष्मी टेकडी येथील शुद्धीकरण प्रकल्पात पाठवले जाणार आहे.त्यामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याचा उपसा कमी झाला तरी हिडकल जलाशयातील पाण्याच्या माध्यमातून तुट भरून काढली जाणार आहे. पाणीपुरवठ्याची वेळापत्रक ही एका दिवसाने वाढविले जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *