Wednesday , December 10 2025
Breaking News

काळ्यादिनी मराठी ताकद दाखवा; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत आवाहन

Spread the love

 

बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. त्यावेळी तत्कालीन मुंबई प्रांतातील काही मराठी बहुल भाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. आज 65 -66 वर्षे मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कासाठी झगडतो आहे. लढ्याचा एक भाग म्हणून एक नोव्हेंबर दिवशी संपूर्ण सीमाभागात निषेध नोंदविण्यात येतो तर बेळगाव शहरामध्ये काळा दिन पाळून सायकल फेरी काढण्यात येते. यावर्षी देखील मराठी भाषिकांनी बहुसंख्येने सायकल फेरीत सहभागी होऊन आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे होते.
सुरुवातीला रणजीत चव्हाण- पाटील यांनी प्रास्ताविक करत काळा दिन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी सायकल फेरी यशस्वी करा. असे आवाहन करत सीमा प्रश्नाच्या खटल्याची माहिती दिली. काळ्या दिनी महाराष्ट्रातून कोणताही आमदार अथवा नेते बोलायचे असतील तर त्यांची माहिती मध्यवर्तीला द्यावी, असे ते म्हणाले. सीमाप्रश्नी आपण वारंवार महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार करत असून तज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी यासाठी महाराष्ट्र सरकारला आजपर्यंत 17 पत्रे पाठविण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले.
यावेळी आबासाहेब दळवी यांनी मराठी शाळांची कमी होत असलेली संख्या आणि अंगणवाडी भरती वेळी प्रथम भाषा कन्नड असणाऱ्यांना प्राधान्य या विरोधात आंदोलन करण्याची सूचना केली. मारुती परमेकर यांनी महाराष्ट्र सरकारशी पाठपुरावा करावा असे सांगितले. सक्रिय सदस्यांनाच मध्यवर्तीमध्ये स्थान देण्याची मागणी मुरलीधर पाटील यांनी केली.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आजवर लढा देत आहे. मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली घटक समित्या कार्यरत आहेत ज्या मराठी भाषिकांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य म्हणून कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी आपली नावे घटक समितीकडे द्यावीत. बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूरसाठी प्रत्येकी वीस सदस्य तर निपाणी आणि बिदरसाठी प्रत्येकी 10 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी समिती कार्यकर्त्यांनी काळा दिन शांततेत व मोठ्या प्रमाणात पाळावा आणि आपला निषेध नोंदवावा असे आवाहन केले.
गोपाळ देसाई, ऍड. एम. जी. पाटील, बी. डी मोहनगेकर यांनीही सूचना मांडल्या.
बैठकीला बी. ओ. येतोजी, बी. एस. पाटील, रावजी पाटील, निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, रामचंद्र गावकर, बाळासाहेब शेलार, नानू पाटील, विकास कलघटगी, एस. एल. चौगुले, जयराम देसाई, रुक्माण्णा झुंजवाडकर, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *