Saturday , March 7 2026
Breaking News

जिल्हा पालक सचिव अंजुम परवेज यांनी घेतली जिल्हा प्रगती आढावा बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असल्याने शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सर्वांना रोजगार आणि नरेगा योजनेंतर्गत गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव डॉ. अंजुम परवेज यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात गुरुवारी झालेल्या जिल्हा प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अंजुम परवेज म्हणाले की, जिल्ह्यातील कोणत्याही शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये. काही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. आता वेळ असल्याने ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य आराखडा तयार करा, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.शहरातील बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. कूपनलिका दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. शासनाकडून दुष्काळ व्यवस्थापनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात नवीन कूपनलिका खोदण्यात येऊ नये. मात्र सध्याच्या कूपनलिका दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना निधी वितरणात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. जिल्ह्यातील 7 हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी, असेही ते म्हणाले.

गृहलक्ष्मी योजना, गृहज्योती आणि शक्ती योजनेचा लाभ शासनाच्या इच्छेनुसार पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले. निर्धारित उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्य़ात बैलहोंगल, बेळगाव शहर व खानापूर तालुक्यात डेंग्यू तापाचे रुग्ण अधिक आढळून आले असून, त्यावर नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असे त्यांनी सांगितले.राज्य सरकारने दुष्काळ व्यवस्थापनासाठी 22.50 कोटी रुपये जाहीर केले आहेत. या अनुदानात नवीन ट्यूबवेल खोदण्याची संधी नसल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याला 17 हजार चारा संचांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत 4 हजार संच प्राप्त झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांनाच चारा संच वाटप करण्यात यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर म्हणाले की, जिल्ह्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या कूपनलिका दुरूस्तीसह नवीन कूपनलिका खोदण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले. कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील 15 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामात ऑक्टोबरपर्यंत 78% पावसाची कमतरता आहे. हिवाळ्यातील पेरण्या रखडल्या असून केवळ 38 टक्के पेरण्या झाल्या असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे नव्याने पेरणी करणे शक्य होणार नाही. परंतु, आधीच पेरलेले पीक बरे येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आढावा बैठकीला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेगनायक, प्रांताधिकारी, विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एमएसएमई नोंदणीकृत व्यापाऱ्यांना दंडातून सवलत देण्याची मागणी

Spread the loveबेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून व्यावसायिक परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर बुधवारी ‘द बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *