Tuesday , December 9 2025
Breaking News

पोलिसांनी केलेल्या फायरींमुळे अपहरण केलेल्या दोन मुलांची सुटका

Spread the love

 

बेळगाव : अथणी तालुक्यातील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या 4 आणि 3 वर्षांच्या दोन लहान मुलांचे अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा जणांवर पोलिसांनी फायरिंग केल्यामुळे मुलांची सुखरूप सुटका झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे घडली आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या भावंडांची नावे स्वस्ती देसाई आणि वियोम देसाई अशी आहेत. नंबर प्लेट नसलेल्या कार गाडीमधून मुलांचे अपहरण केल्याची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुलांचे वडील विजय देसाई यांनी सांगितले की, काल गुरुवारी ते आणि त्यांची पत्नी कामावर गेले होते. त्यावेळी मुलांची आजी घरात एकटीच असताना अपहरणाची घटना घडली. मुलांच्या पालकांनी अथणी पोलिसात मुले हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील आणि इतर कांही लोकांमधील आर्थिक वादातून मुलांचे अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

काल गुरुवारी अपहरणाची घटना घडल्यानंतर, आज शुक्रवारी पहाटे पळवलेल्या मुलांना घेऊन अपहरणकर्ते कारगाडीतून कोहळ्ळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयावरून कार गाडी अडवली. तेंव्हा अपहरणाच्या घटनेचा उलगडा झाला. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अडविल्यानंतर आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने स्वसंरक्षणार्थ फायरिंग करावी लागली.

पोलिसांच्या फायरिंगमध्ये अपहरणकर्त्यापैकी एक संशयित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्या दोन मुलांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे. अथणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *