
बेळगाव : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार भाविकांचे मृतदेह बेळगावला पाठवण्यात आले आहेत.
बेळगाव येथील अरुण कोपर्डे (वय 61) व महादेवी भावनूर (वय 48) यांचे पार्थिव बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सायंकाळी पाच वाजता दाखल होणार आहे.
तर मेघा हत्तरवठ (२४), ज्योती हत्तरवठ (४४) या आई व मुलीचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह दिल्लीहून गोवा आणि गोव्याहून बेळगावला आणले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली – बेळगाव इंडिगोच्या विमानाने दोघांचे मृतदेह दिल्लीहून गोव्याला रवाना होत असल्याने रात्री आठच्या सुमारास मेघा आणि ज्योती या दोघांचेही मृतदेह गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे आणि मध्यरात्री बेळगावला आणण्यात येतील.

Belgaum Varta Belgaum Varta