चिक्कोडी : नाश्त्यात उप्पीट खाल्ल्याने मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
बेळगावमध्ये चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत ही घटना घडली. सकाळी नाश्त्यात विद्यार्थ्यांना उप्पीट देण्यात आले. उप्पीट खाल्ल्यानंतर काही वेळातच ३० विद्यार्थी अत्यवस्थ झाले. अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये हलवण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta